शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:35 IST

Pakistan Minister Fawad Choudhari News: नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा ही पाकिस्तानातील प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जींना शुभकामना आहेत, असे पाकमधील एका माजी मंत्र्याने म्हटले आहे.

Pakistan Minister Fawad Choudhari News: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. मात्र, पाकिस्तानमधील एका माजी मंत्र्याने केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

वास्तविक पाहता भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतात कुणाचे सरकार येणार, पंतप्रधान मोदी यांचे सरकार राहणार की जाणार, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का, अशा अनेक गोष्टींकडे जगभरातील मिडिया आणि तेथील नेतेमंडळी बारीक लक्ष ठेवून आहेत. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानमधील फवाद चौधरी या माजी मंत्र्याने भारतातील निवडणुकीबाबत एक मोठे विधान केले आहे. या विधानामुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायला हवेत

फवाद चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा आधार घेत म्हटले आहे की, मला असे वाटते की, भारतीय मतदाराचा खरा फायदा पाकिस्तानशी संबंध सुधारण्यात आणि भारत विकसनशील देशाकडे वाटचाल करण्यातच आहे. आता हे सर्व तेव्हाच होऊ शकते जेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कट्टर विचारसरणीचा पराभव व्हायलाच हवा. आता त्यांना कोणी पराभूत करेल, मग ते राहुल गांधी असोत, केजरीवाल असोत किंवा ममता बॅनर्जी असोत, आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, जो कट्टरतावाद्यांचा पराभव करेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे फवाद चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले.

भाजपा आणि RSS पाकिस्तानबाबत द्वेष निर्माण करत आहे

सध्याचे विद्यमान सरकार केवळ मुस्लिमांमध्ये द्वेषच निर्माण करत नाही, तर पाकिस्तानबाबतही द्वेष निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत विचारधारेचा हा प्रकार पराभूत होण्याची वेळ आली आहे. भारतीय मतदार हा मूर्ख नाही, त्याला सर्व काही कळते, असे फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरचे मुस्लिम बांधव असोत किंवा उर्वरित भारतातील असोत, त्यांना सध्या कट्टरतावादी विचारसरणीचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पाकिस्तानातील प्रत्येकाची तीच इच्छा आहे. विचारधारचे अतिरेकपणा थांबेल, तेव्हाच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारू शकतील. पाकिस्तानमध्ये भारताविषयी द्वेष नाही. पण, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस आणि भाजपा पाकिस्तानबद्दल द्वेष, मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करत आहे. या विचारसरणीच्या लोकांना पराभूत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना पाकिस्तानकडून पाठिंबा मिळत असल्याच्या प्रश्नावर, पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, ही लोकसभा निवडणूक भारताची आहे आणि भारताची लोकशाही खूप परिपक्व आहे. एक परंपरा आहे आणि भारताच्या मतदारांवर बाहेरील कोणाचाही प्रभाव पडत नाही. मला कळत नाही की, काही मोजकेच लोक आहेत, ज्यांचे आपल्याशी वैर आहे, असे मोजकेच लोक आहेत, तिथून त्यांच्या समर्थनात आवाज का उठतो. आता ही अत्यंत गंभीर बाब आणि तपासणी करण्याची बाब आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Pakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालMamata Banerjeeममता बॅनर्जी