शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

इंडोनेशियातील भूकंपात पाच हजार लोक बेपत्ता; मदतकार्य मंदगतीने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 00:05 IST

भूकंपाचा जोरदार धक्का व त्यापाठोपाठ आलेली त्सुनामी यांचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १७६३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, सुमारे ५ हजार माणसे अद्यापही बेपत्ता आहेत. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे या देशातील मदतकार्याला अनेक मर्यादा येत आहेत.

जकार्ता : भूकंपाचा जोरदार धक्का व त्यापाठोपाठ आलेली त्सुनामी यांचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १७६३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, सुमारे ५ हजार माणसे अद्यापही बेपत्ता आहेत. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे या देशातील मदतकार्याला अनेक मर्यादा येत आहेत.सुलावेसी बेट परिसरात २८ सप्टेंबर रोजी ७.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला व त्सुनामीचेही संकट ओढावले. याचा मोठा फटका पालू-पेटोबो व बालारोआ या दोन भागांना बसला. तेथील इमारती कोसळून त्याच्या ढिगाºयाखाली कित्येक लोक दबले गेले. त्यातील अनेकांची बचावपथकांनी सुखरूप सुटका केली; परंतु तरीही अद्याप पाच हजार जण बेपत्ता आहेत.राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी सांगितले की, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाºयांखाली अद्यापही अडकून पडलेल्यांचा शोध घेण्यासाठी११ आॅक्टोबरपर्यंत मोहीम राबविण्यात येईल. त्यात ज्या व्यक्तींचा शोध लागणार नाही त्यांना बेपत्ता किंवा मृत म्हणून जाहीर केले जाईल. पालू येथील पेटोबो या गावामध्ये भूकंप-त्सुनामीने खूपच नुकसान झाले आहे.२ लाख भूकंपग्रस्त अडचणीतइंडोनेशियातील २ लाख भूकंपग्रस्त विलक्षण अडचणीत असून, त्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्य करावे, असे आवाहन त्या देशाने नुकतेच केले होते. भारताने ‘आॅपरेशन समुद्र मैत्री’ या नावाने इंडोनेशियात मदतमोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत भारतीय वैद्यकीय पथके तिथे रवाना झाली व पुनर्वसनासाठी आवश्यक वस्तू लष्करी हेलिकॉप्टर, विमानाद्वारे त्या देशात पाठविण्यात आल्या.

टॅग्स :Indonesiaइंडोनेशिया