शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

इंडोनेशियातील भूकंपात पाच हजार लोक बेपत्ता; मदतकार्य मंदगतीने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 00:05 IST

भूकंपाचा जोरदार धक्का व त्यापाठोपाठ आलेली त्सुनामी यांचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १७६३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, सुमारे ५ हजार माणसे अद्यापही बेपत्ता आहेत. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे या देशातील मदतकार्याला अनेक मर्यादा येत आहेत.

जकार्ता : भूकंपाचा जोरदार धक्का व त्यापाठोपाठ आलेली त्सुनामी यांचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १७६३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, सुमारे ५ हजार माणसे अद्यापही बेपत्ता आहेत. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे या देशातील मदतकार्याला अनेक मर्यादा येत आहेत.सुलावेसी बेट परिसरात २८ सप्टेंबर रोजी ७.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला व त्सुनामीचेही संकट ओढावले. याचा मोठा फटका पालू-पेटोबो व बालारोआ या दोन भागांना बसला. तेथील इमारती कोसळून त्याच्या ढिगाºयाखाली कित्येक लोक दबले गेले. त्यातील अनेकांची बचावपथकांनी सुखरूप सुटका केली; परंतु तरीही अद्याप पाच हजार जण बेपत्ता आहेत.राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी सांगितले की, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाºयांखाली अद्यापही अडकून पडलेल्यांचा शोध घेण्यासाठी११ आॅक्टोबरपर्यंत मोहीम राबविण्यात येईल. त्यात ज्या व्यक्तींचा शोध लागणार नाही त्यांना बेपत्ता किंवा मृत म्हणून जाहीर केले जाईल. पालू येथील पेटोबो या गावामध्ये भूकंप-त्सुनामीने खूपच नुकसान झाले आहे.२ लाख भूकंपग्रस्त अडचणीतइंडोनेशियातील २ लाख भूकंपग्रस्त विलक्षण अडचणीत असून, त्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्य करावे, असे आवाहन त्या देशाने नुकतेच केले होते. भारताने ‘आॅपरेशन समुद्र मैत्री’ या नावाने इंडोनेशियात मदतमोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत भारतीय वैद्यकीय पथके तिथे रवाना झाली व पुनर्वसनासाठी आवश्यक वस्तू लष्करी हेलिकॉप्टर, विमानाद्वारे त्या देशात पाठविण्यात आल्या.

टॅग्स :Indonesiaइंडोनेशिया