शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

आशियातील 'हे' पाच देश सर्वाधिक प्लास्टिक कचरा समुद्रात टाकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 5:04 PM

प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर

न्यू यॉर्क- आशिया खंडातील पाच देशांमध्ये होणारा प्लास्टिकचा कचरा महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. इंडोनेशियातील सित्रम नदीमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही नदी ओळखण्याच्या पलीकडे गेली आहे. जगातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ती ओळखली जात आहे. या नदीवर प्लास्टिकचा एक थरच निर्माण झाल्यामुळे हे प्लास्टिक काढण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत विविध माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ग्रीन अर्थ या संस्थेच्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये एका दिवसात 52 लाख पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात.आशियामधील चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड आणि व्हिएतनाम सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक महासागरांमध्ये टाकत आहेत. या पाच देशांनी महासागरात फेकलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे जगातील इतर देशांच्या एकत्रित कचऱ्यापेक्षा जास्त आहे असे ओशन कॉन्झर्वन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. अर्थात प्लास्टिकचा प्रश्न जगभरातील सर्वच देशांना भेडसावत आहे. अमेरिकेने 3.36 कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली आणि त्यातील केवळ 9.5 टक्के प्लास्टिक कचऱ्याचेच पुनर्चक्रीकरण करण्यात आले.प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे केवळ सागरी जीवच मरतात असे नाही असे नाही तर त्यातून बाहेर पडणारी विषद्रव्ये मासे खाणाऱ्या लोकांच्याही पोटात जातात. इतक्या प्रदुषणाने सागरी जीवन धोक्यात आले असले तरी प्लास्टिकचा  वापर कमी केल्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  

टॅग्स :pollutionप्रदूषण