शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:37 IST

नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर ...

नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर थेट परिणाम होत आहे व पुढील दशकांमध्येही याचा प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे एका जागतिक अहवालात म्हटले आहे.

तापमान, वणवा, पूर, वादळ, दुष्काळ, आजार आणि समुद्राची वाढती पातळी हे घटक शिक्षणावर परिणाम करीत आहेत. अहवालात म्हटले आहे की, बहुतांश निम्न व मध्यम उत्पन्न असणारे देश दरवर्षी हवामान बदलांमुळे तणावांना सामोरे जात आहेत. यामुळे शिक्षणाचे नुकसान व विद्यार्थीशाळा सोडण्याच्या शक्यता वाढत आहेत.  युनेस्को व कॅनडातील सस्केचवान विद्यापीठाद्वारे संकलित माहितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

अहवालातील धक्कादायक निष्कर्ष  प्रचंड उष्म्याच्या संपर्कात आल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनाची हानी झाली. १९६९ ते २०१२च्या दरम्यान २९ देशांतील जनगणना व जलवायूसंबंधी आकडेवारीचा संबंध जोडला असता, गर्भात राहिल्यापासून ते प्रारंभिक जीवनकाळात सरासरीपेक्षा अधिक तापमानाच्या संपर्कात आल्याचा संबंध विशेष रूपाने आग्नेय आशियामध्ये शालेय शिक्षणाच्या वर्षांमध्ये घट पाहावयास मिळते.सरासरी दोन अंश अधिक तापमानाचा सामना करणाऱ्या बालकांना १.५ वर्ष शालेय शिक्षण कमी मिळेल. मागील २० वर्षांतील नैसर्गिक घटनांमुळे किमान ७५ टक्के वेळा शाळा बंद आहेत. यामुळे ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत.

उच्च तापमानामुळे चीनमध्ये उच्चस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांच्या निकालावर प्रतिकूल परिणाम पडत आहे. हायस्कूल व कॉलेज, पदवीचे प्रवेश कमी झाले आहेत. जकार्तामध्ये २०१३च्या पुरानंतर शाळांमधील प्रवेश विस्कळीत झाला होता. २०१९मध्ये नैसर्गिक घटनांमुळे सर्वांत जास्त प्रभावित होणाऱ्या १० देशांमध्ये ८ निम्न-मध्यम उत्पन्न असणारे देश आहेत.

टॅग्स :weatherहवामान अंदाजHeat Strokeउष्माघातSchoolशाळाStudentविद्यार्थी