शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:37 IST

नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर ...

नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर थेट परिणाम होत आहे व पुढील दशकांमध्येही याचा प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे एका जागतिक अहवालात म्हटले आहे.

तापमान, वणवा, पूर, वादळ, दुष्काळ, आजार आणि समुद्राची वाढती पातळी हे घटक शिक्षणावर परिणाम करीत आहेत. अहवालात म्हटले आहे की, बहुतांश निम्न व मध्यम उत्पन्न असणारे देश दरवर्षी हवामान बदलांमुळे तणावांना सामोरे जात आहेत. यामुळे शिक्षणाचे नुकसान व विद्यार्थीशाळा सोडण्याच्या शक्यता वाढत आहेत.  युनेस्को व कॅनडातील सस्केचवान विद्यापीठाद्वारे संकलित माहितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

अहवालातील धक्कादायक निष्कर्ष  प्रचंड उष्म्याच्या संपर्कात आल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनाची हानी झाली. १९६९ ते २०१२च्या दरम्यान २९ देशांतील जनगणना व जलवायूसंबंधी आकडेवारीचा संबंध जोडला असता, गर्भात राहिल्यापासून ते प्रारंभिक जीवनकाळात सरासरीपेक्षा अधिक तापमानाच्या संपर्कात आल्याचा संबंध विशेष रूपाने आग्नेय आशियामध्ये शालेय शिक्षणाच्या वर्षांमध्ये घट पाहावयास मिळते.सरासरी दोन अंश अधिक तापमानाचा सामना करणाऱ्या बालकांना १.५ वर्ष शालेय शिक्षण कमी मिळेल. मागील २० वर्षांतील नैसर्गिक घटनांमुळे किमान ७५ टक्के वेळा शाळा बंद आहेत. यामुळे ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत.

उच्च तापमानामुळे चीनमध्ये उच्चस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांच्या निकालावर प्रतिकूल परिणाम पडत आहे. हायस्कूल व कॉलेज, पदवीचे प्रवेश कमी झाले आहेत. जकार्तामध्ये २०१३च्या पुरानंतर शाळांमधील प्रवेश विस्कळीत झाला होता. २०१९मध्ये नैसर्गिक घटनांमुळे सर्वांत जास्त प्रभावित होणाऱ्या १० देशांमध्ये ८ निम्न-मध्यम उत्पन्न असणारे देश आहेत.

टॅग्स :weatherहवामान अंदाजHeat Strokeउष्माघातSchoolशाळाStudentविद्यार्थी