शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:37 IST

नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर ...

नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याच्या संपर्कात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दीड वर्षांपर्यंत घट होऊ शकते. कारण हवामान बदलाचा शिक्षणावर थेट परिणाम होत आहे व पुढील दशकांमध्येही याचा प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे एका जागतिक अहवालात म्हटले आहे.

तापमान, वणवा, पूर, वादळ, दुष्काळ, आजार आणि समुद्राची वाढती पातळी हे घटक शिक्षणावर परिणाम करीत आहेत. अहवालात म्हटले आहे की, बहुतांश निम्न व मध्यम उत्पन्न असणारे देश दरवर्षी हवामान बदलांमुळे तणावांना सामोरे जात आहेत. यामुळे शिक्षणाचे नुकसान व विद्यार्थीशाळा सोडण्याच्या शक्यता वाढत आहेत.  युनेस्को व कॅनडातील सस्केचवान विद्यापीठाद्वारे संकलित माहितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

अहवालातील धक्कादायक निष्कर्ष  प्रचंड उष्म्याच्या संपर्कात आल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनाची हानी झाली. १९६९ ते २०१२च्या दरम्यान २९ देशांतील जनगणना व जलवायूसंबंधी आकडेवारीचा संबंध जोडला असता, गर्भात राहिल्यापासून ते प्रारंभिक जीवनकाळात सरासरीपेक्षा अधिक तापमानाच्या संपर्कात आल्याचा संबंध विशेष रूपाने आग्नेय आशियामध्ये शालेय शिक्षणाच्या वर्षांमध्ये घट पाहावयास मिळते.सरासरी दोन अंश अधिक तापमानाचा सामना करणाऱ्या बालकांना १.५ वर्ष शालेय शिक्षण कमी मिळेल. मागील २० वर्षांतील नैसर्गिक घटनांमुळे किमान ७५ टक्के वेळा शाळा बंद आहेत. यामुळे ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत.

उच्च तापमानामुळे चीनमध्ये उच्चस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांच्या निकालावर प्रतिकूल परिणाम पडत आहे. हायस्कूल व कॉलेज, पदवीचे प्रवेश कमी झाले आहेत. जकार्तामध्ये २०१३च्या पुरानंतर शाळांमधील प्रवेश विस्कळीत झाला होता. २०१९मध्ये नैसर्गिक घटनांमुळे सर्वांत जास्त प्रभावित होणाऱ्या १० देशांमध्ये ८ निम्न-मध्यम उत्पन्न असणारे देश आहेत.

टॅग्स :weatherहवामान अंदाजHeat Strokeउष्माघातSchoolशाळाStudentविद्यार्थी