शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 13:10 IST

जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचाा लॉक डाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वाचं पाऊल उचलल आहे.  

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, मोदींनी देशहितासाठी आणि नागरिकांसाठी हे मोठं पाऊल उचललं आहे. देशातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर पोलीस आहेत, तर रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी दिसतात. सर्वच  राज्यांचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री सातत्याने बैठका घेत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेही परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. जागतिक पातळीवर पर्यावरणाशी संबंधित संस्थेत काम करणारे, युरोपातील नॉर्वे या देशाचे राजकीय नेते ईरिक सोल्हेम यांनी भारताने हाताळलेल्या परिस्थितीचे कौतुक केलंय. 

जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचाा लॉक डाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वाचं पाऊल उचलल आहे.  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ८७९ वर गेली आहे. तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळेच, भारताने कोरोनासंबंधी घेतलेल्या निर्णयाचं परदेशातूनही कौतुक होतंय. 

नोर्वे देशाचे माजी पर्यावरण मंत्री आणि एका पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या जागतिक संघटनेशी जोडलेले पर्यावरण प्रेमी ईरीक सोल्हेम यांनी भारत देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचं कौतुक केलंय. जगातील इतर प्रगत देशांच्या तुलतने भारताने कोरोनाशी अतिशय चांगल्या पद्धतीने लढा सुरु केल्याचं सोल्हेम यांनी म्हटलंय. भारतात २१ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमध्ये १.३ मिलियन्स म्हणजेच १३० कोटी नागरिक आपल्या घरात बसून आहेत. भारताचे लॉकडाऊन हे जगातील सर्वात मोठे लॉकडाऊन असून देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही जगातील १/५ लोकसंख्या आहे, असेही  सोल्हेम यांनी सांगितलंय. ईरिक सोल्हेम यांना महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ट्विटरवर फॉलो करतात. 

चीनमधील वुहान शहरात ११ जानेवारी रोजी कोरोनाग्रस्त रुग्णाचा पहिला मृत्यू झाला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या एक असतानाच, १७ जानेवारी रोजी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने चीनमधून भारतात येणाऱ्या सर्वच विदेशी प्रवशांचे दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील विमानतळावर स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने विदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना कोरोनासंदर्भात काही सल्ला आणि सूचना देणारे पत्रक जारी केले.  २१ जानेवारी रोजी भारतात चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या रुग्णांची संख्या ३ होती. तेव्हापासून भारताने अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोनाच लढा उभारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  २४ मार्च रोजी देशभरात २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने घेतलेला हा निर्णय मोठं पाऊल ठरला आहे. भारत सराकरच्या या निर्णयाचे सोल्हेम यांनी कौतुक केलंय. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनenvironmentपर्यावरणNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतHealthआरोग्य