शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

Coronavirus:...तर आम्ही मदत करु; कर्जबाजारी पाक पंतप्रधान इमरान खानची भारताला ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 18:53 IST

आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले आहेत.

ठळक मुद्देभारतातील ३४ टक्के घरं विना मदतीचे १ आठवडेही जगू शकत नाहीएका रिपोर्टचा हवाला देत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर कुरघोडी पाकिस्तानात एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले

इस्लामाबाद – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. अशात पाकिस्तानसारखा देश आर्थिक डबघाईला आल्याने कर्ज काढून देश चालवायची वेळ आली आहे. त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला मदत करण्याची ऑफर दिली आहे. इमरान खान यांनी एका रिपोर्टचा हवाला दिला आहे, भारतातील ३४ टक्के घर विना मदतीचे १ आठवडेही जगू शकत नाही असं म्हटलं आहे.

पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी या बातमीची लिंक ट्विट करत म्हटलं आहे की, या रिपोर्टनुसार भारतात ३४ टक्के घर विना मदतीशिवाय एक आठवड्यापेक्षा जास्त जगू शकत नाहीत. मी भारताला मदत आणि ट्रान्सफर प्रोग्रामला जनतेपर्यंत पोहचू शकतो, आम्ही कॅश ट्रान्सफर प्रोग्राम जनतेपर्यंत पोहचवला आहे. त्यातील पारदर्शकतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकही झालं आहे.

आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले आहेत. जेणेकरुन गरीब कुटुंबांना कोरोना विषाणूच्या काळात जगणं कठीण होणार नाही असं इमरान खान यांनी म्हटलं आहे, इमरान खान यांनी एका रिपोर्टचा हवाला दिला आहे ज्यात कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा भारतात फार गंभीर परिणाम झाला आहे असं म्हटलं आहे.

भारतीयांच्या खात्यावर त्वरित पैसे पाठवण्याची गरज

शिकागो विद्यापीठ आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात हा दावा केला गेला आहे. या अहवालात असं म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सुमारे ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. एकूण कुटुंबांपैकी एक तृतीयांश अतिरिक्त मदतीशिवाय आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत. भारतीयांना त्वरित पैसे आणि अन्न देण्याची नितांत आवश्यकता आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान इमरान खान यांनी मदतीच्या बहाण्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लॉकडाऊनमुळे भारतात अनेक लोक भुकेचे बळी जात आहेत, तसं पाकिस्तानात नुकसान झालं नाही. लॉकडाऊनमुळे देशाला ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानात कोरोना विषाणूचा कहर माजला असताना इमरान खान भारताला मदत देण्याची भाषा करत आहेत. त्यांचे मंत्री कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. विविध बँकांकडून कर्ज घेऊन पाकिस्तान सध्या देश चालवत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मनातील कोरोनाची भीती काढून टाका; ८३ जिल्ह्यांच्या सर्व्हेतून मिळाली समाधानाची बातमी

भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’

त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!

मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याImran Khanइम्रान खानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी