शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:...तर आम्ही मदत करु; कर्जबाजारी पाक पंतप्रधान इमरान खानची भारताला ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 18:53 IST

आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले आहेत.

ठळक मुद्देभारतातील ३४ टक्के घरं विना मदतीचे १ आठवडेही जगू शकत नाहीएका रिपोर्टचा हवाला देत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर कुरघोडी पाकिस्तानात एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले

इस्लामाबाद – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. अशात पाकिस्तानसारखा देश आर्थिक डबघाईला आल्याने कर्ज काढून देश चालवायची वेळ आली आहे. त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला मदत करण्याची ऑफर दिली आहे. इमरान खान यांनी एका रिपोर्टचा हवाला दिला आहे, भारतातील ३४ टक्के घर विना मदतीचे १ आठवडेही जगू शकत नाही असं म्हटलं आहे.

पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी या बातमीची लिंक ट्विट करत म्हटलं आहे की, या रिपोर्टनुसार भारतात ३४ टक्के घर विना मदतीशिवाय एक आठवड्यापेक्षा जास्त जगू शकत नाहीत. मी भारताला मदत आणि ट्रान्सफर प्रोग्रामला जनतेपर्यंत पोहचू शकतो, आम्ही कॅश ट्रान्सफर प्रोग्राम जनतेपर्यंत पोहचवला आहे. त्यातील पारदर्शकतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकही झालं आहे.

आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले आहेत. जेणेकरुन गरीब कुटुंबांना कोरोना विषाणूच्या काळात जगणं कठीण होणार नाही असं इमरान खान यांनी म्हटलं आहे, इमरान खान यांनी एका रिपोर्टचा हवाला दिला आहे ज्यात कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा भारतात फार गंभीर परिणाम झाला आहे असं म्हटलं आहे.

भारतीयांच्या खात्यावर त्वरित पैसे पाठवण्याची गरज

शिकागो विद्यापीठ आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात हा दावा केला गेला आहे. या अहवालात असं म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सुमारे ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. एकूण कुटुंबांपैकी एक तृतीयांश अतिरिक्त मदतीशिवाय आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत. भारतीयांना त्वरित पैसे आणि अन्न देण्याची नितांत आवश्यकता आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान इमरान खान यांनी मदतीच्या बहाण्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लॉकडाऊनमुळे भारतात अनेक लोक भुकेचे बळी जात आहेत, तसं पाकिस्तानात नुकसान झालं नाही. लॉकडाऊनमुळे देशाला ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानात कोरोना विषाणूचा कहर माजला असताना इमरान खान भारताला मदत देण्याची भाषा करत आहेत. त्यांचे मंत्री कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. विविध बँकांकडून कर्ज घेऊन पाकिस्तान सध्या देश चालवत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मनातील कोरोनाची भीती काढून टाका; ८३ जिल्ह्यांच्या सर्व्हेतून मिळाली समाधानाची बातमी

भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’

त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!

मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याImran Khanइम्रान खानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी