शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

CoronaVirus News : भारत हा चीनला कधीच पर्याय ठरू शकत नाही, चिनी वर्तमानपत्राची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 07:14 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : काही कंपन्यांनीही आपले चीनमधील उत्पादनांचे कारखाने भारतात हलविण्याचे ठरविले आहे. यामुळे भेदरलेल्या चीनने भारतावर टीका करीत आमची जागा तुम्ही कधीच घेऊ शकणार नाही, असे सुनावले आहे.

बीजिंग : कोरोनाच्या संकटामुळे जगातील सगळ्याच देशांना मोठा फटका बसला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही संकटात सापडल्या आहेत. याला चीनही अपवाद नाही. सध्याच्या स्थितीत जगभराचे उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून चीनचे असलेले महत्त्व कमी होण्याच्या मार्गावर आहे. ही संधी साधत भारताने ही जागा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.काही कंपन्यांनीही आपले चीनमधील उत्पादनांचे कारखाने भारतात हलविण्याचे ठरविले आहे. यामुळे भेदरलेल्या चीनने भारतावर टीका करीत आमची जागा तुम्ही कधीच घेऊ शकणार नाही, असे सुनावले आहे. चिनी सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने भारताच्या धोरणावर तोेंडसुख घेत चीनला भारत कधीही पर्याय ठरू शकत नाही, अशी टीका केली आहे.अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपला चीनमधील उत्पादनाचा कारखाना उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.चीनबाबत वाढलेल्या नाराजीमुळे इतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपली उत्पादन केंद्रे अन्यत्र हलविण्याच्या विचारात आहेत. चीन सोडून इतर पयार्यांचा विचार करणाऱ्या कंपन्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक टास्क फोर्सही तयार केल्याचे समजते. यामुळेच चीनमधील चिंता वाढली आहे.ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात भारत जगातील प्रमुख उत्पादकाची जागा घेऊ शकत नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, असा प्रचार व्यर्थ अभिमान बाळगणारे लोक करीत आहेत; पण हे निव्वळ प्रचारतंत्र आहे. खरेतर हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. खरेतर या काळात काही पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी चीनमधील बाजार भविष्यात कसा असेल, यावर चर्चा सुरू केली. भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह त्यांनी दाखवला. त्यामुळे काही भारतीय वास्तव स्थिती लक्षात न घेता विचार करू लागले आहेत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या