शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

CoronaVirus News : भारत हा चीनला कधीच पर्याय ठरू शकत नाही, चिनी वर्तमानपत्राची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 07:14 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : काही कंपन्यांनीही आपले चीनमधील उत्पादनांचे कारखाने भारतात हलविण्याचे ठरविले आहे. यामुळे भेदरलेल्या चीनने भारतावर टीका करीत आमची जागा तुम्ही कधीच घेऊ शकणार नाही, असे सुनावले आहे.

बीजिंग : कोरोनाच्या संकटामुळे जगातील सगळ्याच देशांना मोठा फटका बसला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही संकटात सापडल्या आहेत. याला चीनही अपवाद नाही. सध्याच्या स्थितीत जगभराचे उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून चीनचे असलेले महत्त्व कमी होण्याच्या मार्गावर आहे. ही संधी साधत भारताने ही जागा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.काही कंपन्यांनीही आपले चीनमधील उत्पादनांचे कारखाने भारतात हलविण्याचे ठरविले आहे. यामुळे भेदरलेल्या चीनने भारतावर टीका करीत आमची जागा तुम्ही कधीच घेऊ शकणार नाही, असे सुनावले आहे. चिनी सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने भारताच्या धोरणावर तोेंडसुख घेत चीनला भारत कधीही पर्याय ठरू शकत नाही, अशी टीका केली आहे.अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपला चीनमधील उत्पादनाचा कारखाना उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.चीनबाबत वाढलेल्या नाराजीमुळे इतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपली उत्पादन केंद्रे अन्यत्र हलविण्याच्या विचारात आहेत. चीन सोडून इतर पयार्यांचा विचार करणाऱ्या कंपन्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक टास्क फोर्सही तयार केल्याचे समजते. यामुळेच चीनमधील चिंता वाढली आहे.ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात भारत जगातील प्रमुख उत्पादकाची जागा घेऊ शकत नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, असा प्रचार व्यर्थ अभिमान बाळगणारे लोक करीत आहेत; पण हे निव्वळ प्रचारतंत्र आहे. खरेतर हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. खरेतर या काळात काही पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी चीनमधील बाजार भविष्यात कसा असेल, यावर चर्चा सुरू केली. भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह त्यांनी दाखवला. त्यामुळे काही भारतीय वास्तव स्थिती लक्षात न घेता विचार करू लागले आहेत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या