शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:14 IST

Congress Shashi Tharoor News: शशी थरूर यांचे शिष्टमंडळ वॉशिंग्टन येथे असून, राहुल गांधी यांच्या विधानावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Congress Shashi Tharoor News:ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारताने केवळ पाकिस्तानला नाही, तर जगाला आपल्या ताकदीची एक झलक दाखवली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याचा चंग बांधलेल्या केंद्र सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले. या सर्वांवर कळस म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’. यानंतर पाकिस्तानने अनेक दावे केले. परंतु, भारताने सर्व दावे फेटाळून लावले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पुरावेही दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’वरून देशांतर्गत राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर विविध प्रश्नही उपस्थित केले. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. परंतु, आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही राहुल गांधी यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. 

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत जगभरातील देशांना माहिती देण्यासाठी भारतातील खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये आहे. शशी थरूर यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ अमेरिकेत असून, वॉशिंग्टन येथे पत्रकारांशी बोलताना शशी थरूर यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. एका पत्रकाराने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना विचारले की, भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडच्या संघर्षादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कथित मध्यस्थी प्रयत्नांचा मुद्दा सतत उपस्थित केला जात आहे. तुमचा पक्ष यासंदर्भात सातत्याने सवाल करत आहे. तुमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले की पंतप्रधान मोदी ट्रम्पसमोर ‘सरेंडर’ केले. 

भारताला कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही

याला उत्तर देताना शशी थरूर म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आदर करतो. असे म्हणू शकतो की, आम्ही कोणालाही मध्यस्थी करण्यास सांगितले नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाची भाषा करत राहील, तोपर्यंत आम्हालाही पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही. जर त्यांना दहशतवादासाठीच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करायच्या असतील, तरच त्यांच्याशी चर्चेचा विचार केला जाऊ शकतो. पाकिस्तानला भारताशी सामान्य संबंध हवे आहेत हे त्यांनी दाखवून दिले, तर संवाद करण्यास हरकत नाही. परंतु, यासाठी भारताला कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही. आम्हाला थांबायला सांगण्याची गरज नव्हती, असे शशी थरूर यांनी नमूद केले. 

दरम्यान, मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि म्हणाले की, मोदीजी काय करत आहात? नरेंदर, सरेंडर, त्यानंतर जी हुजूर म्हणत नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याचे पालन केले. तुम्हाला एक काळ माहिती असेल जेव्हा फोन नाही तर सातवे आरमार आले होते. मात्र तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मला जे करायचे आहे ते मी करेन. हाच फरक आहे. यांचे व्यक्तिमत्त्वच असे आहे. यांना स्वातंत्र्याच्या काळापासून सरेंडरवाले पत्र लिहिण्याची सवय आहे. थोडासा दबाव आला की, हे लोक लगेच  सरेंडर करतात. काँग्रेस पार्टी सरेंडर करत नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. ही मंडळी सरेंडर करणारी नाही तर महाशक्तीसोबत लढणारी होती.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरShashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAmericaअमेरिका