शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

चिनच्या उलट्या बोंबा! लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीसाठी भारतालाच ठरवले जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 22:29 IST

सीमारेषेवर सातत्याने भारताच्या कुरापती काढत असलेल्या चीनने आता लडाखमधील झटापटीवरून उलटा कांगावा करण्यास सुरुवात  केली आहे. 15 ऑगस्टला डोकलाम येथे दोन्ही देशांच्या सैनिकामध्ये झालेल्या दगडफेकीसाठी  भारताला जबाबदार धरले आहे. भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांविरोधात हिंसक कारवाई केली, त्यामुळे संघर्षाला तोंड फुटले, असा दावा चीवने केला आहे. 

बीजिंग, दि. 21 - सीमारेषेवर सातत्याने भारताच्या कुरापती काढत असलेल्या चीनने आता लडाखमधील झटापटीवरून उलटा कांगावा करण्यास सुरुवात  केली आहे. 15 ऑगस्टला डोकलाम येथे दोन्ही देशांच्या सैनिकामध्ये झालेल्या दगडफेकीसाठी  भारताला जबाबदार धरले आहे. भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांविरोधात हिंसक कारवाई केली, त्यामुळे संघर्षाला तोंड फुटले, असा दावा चीवने केला आहे. 15 ऑगस्टच्या सकाळी लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ भारत आणि चीनचे सैनिक समोरासमोर आले होते. चिनी सैनिकांनी या सरोवरातून भारतीय भागात घुसखोरी करण्यास प्रयत्न केला. तेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांना अटकाव केला. भारतीय सैनिकांनी रोखल्याने संतप्त झालेल्या चिनी सैनिकांनी दगडफेकही केली. त्यामुळे काही सैनिकांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. दरम्यान, चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले की, "चिनी सैनिक आपल्या हद्दीत गस्त घालत असताना भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यावेळी झालेल्या दरडफेकीत काही सैनिक जखमी झाले. मात्र ही घटना समोर आल्यावर  दोन्हीकडच्या आर्मी कमांडर्सनी याबाबत चर्चा केल्याचे भारताने सांगितले होते.  अधिक वाचा चीन नाही जिंकू शकणार भारताबरोबर युद्ध ! फक्त दोन्ही बाजूला होईल रक्तपातभारतावर जरब बसवण्यासाठी चिनी लष्कराने तिबेटच्या अज्ञात भागात केला जोरदार युद्ध सरावचीनचे संकट आणि भारताचे एकाकीपण भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा लडाखमधील घुसखोरीचा डाव स्वातंत्र्यदिनी उधळून लावला होता. चिनी सैनिकांना पिटाळून लावताना झालेल्या धक्‍काबुक्‍कीत आणि दगडफेकीत दोन्हीकडील लोक जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या धक्काबुक्की आणि दगडफेकीचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडिायावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात भारत-चीन सैनिकांच्या धक्काबुक्कीची ही घटना झाल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओत 50 हून अधिक सैनिक दिसत आहेत. लडाख परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या व्हिडिओ संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक एकमेकांसमोर आले होते. ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, चीनने हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. चीन सैनिकांचा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. मात्र, असे काही घडल्याची आपणास माहिती नाही, अशी साळसूद भूमिका चीन सरकारने घेतली होती. . भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यानेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता.  

टॅग्स :Indiaभारत