शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:57 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर आता चीननेही या वादात उडी घेतली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर आता चीननेही या वादात उडी घेतली आहे. यावर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चीनने मध्यस्थी केल्याचा खळबळजनक दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केला आहे. मात्र, भारताने नेहमीप्रमाणे कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नाकारली असून, हा वाद द्विपक्षीय चर्चेतून सुटल्याचे स्पष्ट केले आहे.

वांग यी यांचा दावा काय? 

बीजिंगमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना वांग यी म्हणाले की, "यावर्षी जगभरात सीमावाद आणि संघर्षाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही परिस्थिती पहिल्यांदाच इतकी गंभीर आहे. अशा परिस्थितीत चीनने जगातील अनेक हॉटस्पॉट मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये उत्तर म्यानमार, इराण अणुकरार, इस्रायल-पॅलेस्टाईन आणि विशेषतः भारत-पाकिस्तानमधील तणावाचा समावेश आहे." चीनने कायम शांततेच्या बाजूने भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मे महिन्यातील तो धगधगता संघर्ष 

या दाव्यामागे मे महिन्यातील भारत-पाक सीमेवरील तणावाचे संदर्भ दिले जात आहेत. ७ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली होती. यामुळे दोन्ही देशांत १० मेपर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता. हा संघर्ष दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांच्या थेट चर्चेनंतर थांबला होता.

भारताची भूमिका स्पष्ट: तिसऱ्याची गरज नाही! 

चीनच्या या दाव्यावर अद्याप भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याआधी अनेकदा स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानसोबतचा कोणताही मुद्दा हा द्विपक्षीय आहे. ७ ते १० मे दरम्यान झालेला संघर्ष हा कोणत्याही मध्यस्थीमुळे नव्हे, तर दोन्ही देशांच्या लष्करातील थेट संवादामुळे निवळला होता, असा भारताचा ठाम विश्वास आहे. अमेरिकेनेही यापूर्वी असाच दावा केला होता, जो भारताने फेटाळून लावला होता.

चीनच्या दाव्यामागे राजकारण? 

चीन सध्या जागतिक स्तरावर आपली प्रतिमा एक 'शांतता दूत' म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. म्यानमार, कंबोडिया आणि थायलंडच्या वादातही आपण मध्यस्थी केल्याचे वांग यी यांनी आवर्जून सांगितले. मात्र, भारतासारख्या बलाढ्य देशाच्या अंतर्गत आणि द्विपक्षीय विषयात चीनने असा दावा करणे, हे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China claims mediation in India-Pakistan conflict, India denies need.

Web Summary : China claims it mediated India-Pakistan tensions, echoing a prior US claim. India refutes this, asserting bilateral resolution. The issue was resolved through direct military talks, not mediation. China's claim is viewed as an attempt to project itself as a global peacemaker.
टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरwarयुद्धchinaचीनAmericaअमेरिका