शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:57 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर आता चीननेही या वादात उडी घेतली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर आता चीननेही या वादात उडी घेतली आहे. यावर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चीनने मध्यस्थी केल्याचा खळबळजनक दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केला आहे. मात्र, भारताने नेहमीप्रमाणे कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नाकारली असून, हा वाद द्विपक्षीय चर्चेतून सुटल्याचे स्पष्ट केले आहे.

वांग यी यांचा दावा काय? 

बीजिंगमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना वांग यी म्हणाले की, "यावर्षी जगभरात सीमावाद आणि संघर्षाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही परिस्थिती पहिल्यांदाच इतकी गंभीर आहे. अशा परिस्थितीत चीनने जगातील अनेक हॉटस्पॉट मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये उत्तर म्यानमार, इराण अणुकरार, इस्रायल-पॅलेस्टाईन आणि विशेषतः भारत-पाकिस्तानमधील तणावाचा समावेश आहे." चीनने कायम शांततेच्या बाजूने भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मे महिन्यातील तो धगधगता संघर्ष 

या दाव्यामागे मे महिन्यातील भारत-पाक सीमेवरील तणावाचे संदर्भ दिले जात आहेत. ७ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली होती. यामुळे दोन्ही देशांत १० मेपर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता. हा संघर्ष दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांच्या थेट चर्चेनंतर थांबला होता.

भारताची भूमिका स्पष्ट: तिसऱ्याची गरज नाही! 

चीनच्या या दाव्यावर अद्याप भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याआधी अनेकदा स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानसोबतचा कोणताही मुद्दा हा द्विपक्षीय आहे. ७ ते १० मे दरम्यान झालेला संघर्ष हा कोणत्याही मध्यस्थीमुळे नव्हे, तर दोन्ही देशांच्या लष्करातील थेट संवादामुळे निवळला होता, असा भारताचा ठाम विश्वास आहे. अमेरिकेनेही यापूर्वी असाच दावा केला होता, जो भारताने फेटाळून लावला होता.

चीनच्या दाव्यामागे राजकारण? 

चीन सध्या जागतिक स्तरावर आपली प्रतिमा एक 'शांतता दूत' म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. म्यानमार, कंबोडिया आणि थायलंडच्या वादातही आपण मध्यस्थी केल्याचे वांग यी यांनी आवर्जून सांगितले. मात्र, भारतासारख्या बलाढ्य देशाच्या अंतर्गत आणि द्विपक्षीय विषयात चीनने असा दावा करणे, हे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China claims mediation in India-Pakistan conflict, India denies need.

Web Summary : China claims it mediated India-Pakistan tensions, echoing a prior US claim. India refutes this, asserting bilateral resolution. The issue was resolved through direct military talks, not mediation. China's claim is viewed as an attempt to project itself as a global peacemaker.
टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरwarयुद्धchinaचीनAmericaअमेरिका