चीन काही दिवसातच नवीन ड्रोन लाँच करणार आहे. डासांच्या आकाराचा नवीन ड्रोन लाँच केला आहे. चीन आता अत्याधुनिक शस्त्रांची निर्मिती करत आहे. याबाबत चीनच्या सरकारी माध्यमांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञ डासांसारखा दिसणारा रोबोट हातात धरलेले दिसत आहेत. हे ड्रोन अनेक प्रकारच्या लष्करी आणि इतर मोहिमांसाठी योग्य असतील. अशा ड्रोनचा वापर लोकांचे खासगी संभाषण ऐकण्यासाठी, लोकांचा मागोवा घेण्यासाठी किंवा पासवर्ड चोरण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा तज्ञांनी केला आहे.
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
संरक्षण तज्ञ टिमोथी हीथ यांनी इशारा दिला आहे. अशा उपकरणांचा वापर पासवर्डसारखी वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये ड्रोनने धोकादायक गोष्टींची वाहतूक केली जाऊ शकते, असा इशारा गुगलसोबत काम करणाऱ्या ट्रेसी फॅलोज यांनी दिला आहे. या ड्रोनद्वारे प्राणघातक विषाणू देखील पाठवले जाऊ शकतात.
हा ड्रोन अधिक धोकादायक असू शकतो. या ड्रोनला ओळखणे कठीण असणार आहे. कारण सामान्य डासांसारखाच हा ड्रोन दिसणार आहे. यामुळे या ड्रोनचा माग काढणे कठीण होणार आहे.
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?
इराण-इस्त्रायल यांच्यात एकीकडे तणाव वाढलेला पाहता भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष कमी करण्याच्या दिशेने दोन्ही देशांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी बीजिंगमध्ये भेट घेत चर्चा केली. सोमवारी झालेल्या या बैठकीत सीमावर्ती भागात शांतता, स्थिरता त्याशिवाय दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. डोवाल आणि वांग यांनी भारत-चीन यांच्या संबंधांवर चर्चा केली. दोन्ही देशाच्या हिताचे आणि विकासाला चालना देण्याच्या मुद्द्यावर चर्चेत भर दिला गेला.
परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शांतता राखण्यासाठी दहशतवाद्यांचा ठोस सामना करण्याबाबत चर्चा केली. भारताने दहशतवादाचा मुद्दा अशावेळी उचलला आहे जेव्हा मागील काही महिन्यापासून भारत-पाकिस्तान संघर्षात चीनकडून पाकिस्तानला समर्थन मिळत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर हाती घेत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. भारताच्या या कारवाईनंतर ४ दिवस पाकिस्तानसोबत संघर्ष सुरू होता. या संघर्षात १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करण्यावर सहमती झाली. परंतु भारत-पाकिस्तान संघर्षात चीनकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले होते.