शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

China Bullet Train Tibet: चीनची नवी खेळी! भारतीय सीमेजवळ तिबेटमध्ये बुलेट ट्रेनची सेवा सुरु; तणाव वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 16:31 IST

China Bullet Train Tibet: चीनने थेट तिबेटमध्ये पोहोचण्याऱ्या एका बुलेट ट्रेनची सेवा सुरू केली आहे.

बीजिंग: भारत आणि चीनमधील तणाव कमी होताना दिसत नाही. लडाख सीमेसंदर्भात दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चा होऊनही ठोस तोडगा अद्यापही निघालेला नाही. अशातच आता चीनने थेट तिबेटमध्ये पोहोचण्याऱ्या एका बुलेट ट्रेनची सेवा सुरू केली आहे. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. (china started first bullet train in tibet close to indian lac border in tibet)

चीनने भारतीय सीमेजवळ असलेल्या तिबेट भागातील हिमालयाच्या क्षेत्रात संपूर्णपणे इलेक्ट्रिफिकेशन असलेली बुलेट ट्रेनची सेवा सुरू केली आहे. प्रांतीय राजधानी लहासा आणि नियंगची हे भाग या बुलेट ट्रेनने जोडले जाणार असून, नियंगची हा भाग अरुणाचल प्रदेशच्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे. 

४८ तासांचा प्रवास १३ तासांवर

सिचुआन-तिबेट रेल्वेअंतर्गत येणाऱ्या लहासा-नियंगची या मार्गावर ४३५.५ किमी दरम्यान ही पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे. सत्तारुढ पक्ष सीपीसीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने या मार्गावरील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. या सेवेमुळे ४८ तासांचा प्रवास १३ तासांवर येणार आहे. नियंगडमधील मेडोग हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या सीमेच्या अत्यंत जवळ असल्याचे सांगितले जात आहे. 

भारत जमीन बळकावत असल्याच्या चीनच्या उलट्या बोंबा

दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी कतार इकोनॉमिक फोरममध्ये दिलेल्या भाषणावरुन चीनचा थयथयाट झाला आहे. जयशंकर यांनी खडेबोल सुनावल्यानंतर चीनला चांगलीच मिरची झोंबली असून भारत एक 'अतिक्रमणकारी' देश असल्याचा बेछुट आरोप चीनने केला आहे. सीमा वादावर आम्हाला शांतीपूर्ण पद्धतीने तोडगा काढायचा आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सीमावादावरुन तोडणे योग्य ठरणार नाही. चर्चा हाच या वादावरचा पर्याय असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान यांनी म्हटले आहे. कतार इकोनॉमिक फोरमला संबोधित करताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाल्याचे म्हटले होते. सीमेवर चीनकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करणे आणि सैन्य कमी करण्यासाठी सहकार्य न करणे, असे आरोप जयशंकर यांनी केले होते. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशBullet Trainबुलेट ट्रेनchinaचीन