शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 21:37 IST

India Pakistan Ceasefire Agreement: भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव शस्त्रसंधीनंतर निवळला आहे. आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी शस्त्रसंधीबद्दल झालेल्या एकमताबद्दल माहिती दिली. 

India Pakistan ceasefire Update: भारत पाकिस्तान यांच्यात लष्करी पातळीवर चर्चा झाल्यानंतर सीमेवरील तणाव निवळला आहे. दोन्ही देशात शस्त्रसंधी करण्यावर सहमती बनली. या शस्त्रसंधीबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पाकिस्तानच्या संसदेत मोठं विधान केले. दोन्ही देशात झालेल्या चर्चेनुसार १८ मेपर्यंत शस्त्रसंधी वाढवण्यात आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीनेही याबद्दल वृत्त दिले आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात रविवारपर्यंत म्हणजे १८ मेपर्यंत शस्त्रसंधी वाढवण्यावर एकमत झाले आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री काय बोलले?

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीही पाकिस्तानच्या संसदेत दोन्ही देशातील शस्त्रसंधीबद्दल माहिती दिली. 

"10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये डीजीएमओ स्तरावर चर्चा झाली. त्यात १२ मेपर्यंत शस्त्रसंधी करण्यावर एकमत झाले होते. १२ मे रोजी जी चर्चा झाली, त्यात १४ मेपर्यंत शस्त्रसंधी करण्यावर एकमत झाले. १४ मे रोजी पुन्हा चर्चा झाली आणि त्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी वाढवण्याला दोन्ही देशांनी होकार दिला आहे. ही सहमती पूर्ण सहमती नाहीये. जोपर्यंत राजनैतिक स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार नाही, तोपर्यंत ही पूर्ण सहमती बनणार नाही", असेही ते म्हणाले. 

वाचा >>"मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उडवल्यानंतर पाक लष्कराने हवाई हल्ले केले होते. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढला होता. याचे रुपांतर लष्करी संघर्षात झाले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक हवाई दलाच्या तळांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानकडून चर्चेचा प्रस्ताव आला होता. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान