BNP ने निवडणूक जिंकण्यासाठी भारतासोबत हातमिळवणी केली, बांगलादेशमधील विद्यार्थी नेत्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:32 IST2026-02-20T15:31:38+5:302026-02-20T15:32:21+5:30
Bangladesh Election News: २०२४ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर सुमारे दीड वर्षाने बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर बांगलादेशमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे.

BNP ने निवडणूक जिंकण्यासाठी भारतासोबत हातमिळवणी केली, बांगलादेशमधील विद्यार्थी नेत्याचा आरोप
२०२४ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर सुमारे दीड वर्षाने बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर बांगलादेशमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. तसेच विद्यार्थी नेते, एनसीपीचे संयोजक आणि विरोधी पक्षांचे चिफ व्हिप नाहिद इस्लामने निवडणूक जिंकलेल्या बीएनपीवर गंभीर आरोप केले आहेत. बीएनबीने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भारत आणि अवामी लीगसोबत हातमिळवणी केली, असा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी नाहिद इस्लाम म्हणाले की, जर व्होट बँकेच्या राजकारणासाठी अवामी लीगला बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा स्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला, तर जनता त्याला तीव्र विरोध करेल. तसेच देशातील जनता कुठल्याही प्रकारच्या राजकीय पुनर्वसनाच्या प्रयत्नांना स्वीकार करणार नाही. तसेच लोकशाही पद्धतीने याचा विरोध केला जाईल.
नाहिद इस्लामने सांगितले की, जर सरकार अवामी लीगविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरलं, तर याची पूर्ण जबाबदारी ही सरकारवर असेल. तसेच जर अवामी लीगला पुन्हा संघटित करण्याचा प्रयत्न झाला, तर आमचा पक्ष याला व्यापक पातळीवर विरोध करेल.