शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

"बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार, हसीना पुन्हा परतणार नाहीत"; अमेरिकेतील मुलाशी झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 10:08 IST

sheikh hasina Bangladesh Clash: हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. एनडीटीव्ही, आजतकला जॉय यांनी मुलाखत दिली आहे. आपल्या आईला बांगलादेश सोडायचा नव्हता, परंतू तिची सुरक्षा पाहता आम्ही तिला समजावले असे जॉय म्हणाले

बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य शेख हसीना यांच्या मुलाने केले आहे. तसेच शेख हसीना यांच्याशी आज सकाळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. सजीब वाजेद जॉय हे कुटुंबासह अमेरिकेत असतात, हसीना देखील आता नातवांसोबत अमेरिकेतच राहतील असेही जॉ़य यांनी स्पष्ट केले आहे. 

मोठा दावा! शेख हसीनांना आर्मीनेच बांगलादेश सोडायला भाग पाडले, दिली ४५ मिनिटे...

हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. एनडीटीव्ही, आजतकला जॉय यांनी मुलाखत दिली आहे. आपल्या आईला बांगलादेश सोडायचा नव्हता, परंतू तिची सुरक्षा पाहता आम्ही तिला समजावले असे जॉय म्हणाले. हसीना यांनी बांगलादेशाला स्थिर आणि चांगले सरकार दिले होते. बांगलादेशाला विकासाच्या मार्गावर नेले होते. त्यांनी दहशतवादाचा मुकाबला केला होता. बांगलादेशाच्या सध्याच्या परिस्थितीवर त्या हताश आणि निराश असल्याचे जॉ़य यांनी सांगितले. 

देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याची ताकद वापरणे गरजेचे झाले होते. परंतू, विद्यार्थ्यांविरोधात सैन्याचे बळ वापरण्यास हसीना यांनी विरोध केला. यामुळे त्यांनी आपणच राजीनामा देणे उचित समजले. या सर्व घटनाक्रमात जमात ए इस्लामीची भूमिका आहे. यामध्ये सामान्य बांगलादेशी मुळीच सहभागी नाहीत, असे जॉय म्हणाले. तसेच आम्ही आमच्या नेत्यांचे संरक्षण नक्कीच करू. १९७५ मध्येही पक्षाच्या नेत्यांची हत्या झाली होती. आम्हाला तशीच परिस्थिती पुन्हा नको होती. परंतू आता बांगलादेशाच्या भविष्याची जबाबदारी आमची राहिलेली नाही, असे स्पष्ट शब्दांत जॉय म्हणाले.

आता बांगलादेश पुढील पाकिस्तान होणार आहे. आम्ही सैन्यावर टीका करणार नाही. हेच त्यांचे नशीब आहे. हसीना पुन्हा कधीही बांगलादेशला परतणार नाहीत. त्या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांची राजकारणातील ही शेवटची टर्म होती. त्या निवृत्त होणार होत्या. चीनने देशाच्या कारभारात कधीच हस्तक्षेप केलेला नाही. त्यांचा यात हात नाही. बांगलादेशाला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतू आता हसीना लोकांना वाचविण्यासाठी परत येणार नाहीत, असे उद्विग्न सूर जॉय यांनी काढले. 

आमच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. मला वाटत नाही निष्पक्ष निवडणूक होईल. आमच्या कुटुंबाने बांगलादेशात विकास करून दाखविला आहे. जर आता बांगलादेशचे लोक सोबत उभे राहण्यास इच्छुक नसतील तर लोकांना तेच नेतृत्व मिळेल ज्याचे ते हकदार आहेत, असे जॉय यांनी सांगितले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश