शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

बांगलादेश - कंडोमची योजना फसल्याने आता रोहिंग्यांची नसबंदी करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 12:33 IST

बांगलादेशने त्यांच्याकडे आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची नसबंदी करण्याची योजना आखली आहे. रोहिंग्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही अपयश हाती आल्याने, अखेर नसबंदी करण्याची योजना आखण्यात आली आहे.

ठळक मुद्देबांगलादेशने त्यांच्याकडे आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची नसबंदी करण्याची योजना आखली आहेरोहिंग्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही अपयश हाती आल्याने घेतला निर्णयम्यानमारमध्ये झालेल्या हिंसेनंतर जवळपास सहा लाखहून जास्त रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे

ढाका - बांगलादेशने त्यांच्याकडे आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची नसबंदी करण्याची योजना आखली आहे. रोहिंग्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही अपयश हाती आल्याने, अखेर नसबंदी करण्याची योजना आखण्यात आली आहे. गेल्या महिन्यात रोहिंग्यांच्या कॅम्पमध्ये कंडोम वाटण्यात आले होते, मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. म्यानमारमध्ये झालेल्या हिंसेनंतर जवळपास सहा लाखहून जास्त रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे. 

म्यानमारहून शरणार्थी आलेल्या रोहिंग्यांनी अन्न आणि स्वच्छ पाण्यासारख्या सुविधांसाठी झगडावं लागत आहे. अशा परिस्थितीत रोहिंग्यांच्या संख्येवर नियंत्रण आणलं नाही, तर परिस्थिती अजून बिघडू शकते याची भीती अधिका-यांना वाटत आहे. कुटुंब नियोजन योजनेचे प्रमुख पिंटू कांती भट्टाचार्जी यांनी सांगितलं आहे की, रोहिंग्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासंबंधी अज्ञान आहे, त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे. 

एएफपीशी केलेल्या बातचीतमध्ये त्यांनी सांगितलं की, 'संपुर्ण समाजाला जाणुनबुजून अशिक्षत आणि मागासलेलं ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. अशा परिस्थितीत लोकसंख्या नियंत्रणासंबंधी जागरुकताही कमी आहे'. पिंटू कांती भट्टाचार्जी यांनी माहिती दिली की, 'रोहिंग्या कॅम्पमध्ये मोठी कुटुंबं असणं काही वेगळी गोष्ट नाही. काहीजणांना 19 हून जास्त मुलं आहेत, तर अनेक रोहिंग्यांना एकाहून जास्त पत्नी आहेत'.

जिल्हा कुटुंब योजनेच्या अधिका-यांनी कंडोम वाटण्यासाठी एक मोहिम सुरु केली होती. मात्र आतापर्यंत फक्त 550 कंडोम पॅकेट वाटण्यात आले आहेत. पण अनेक लोक कंडोमचा वापर करण्यास इच्छुक नाहीत. यामुळेच आम्ही सरकारकडे रोहिंग्या पुरुष आणि महिलांची नसबंदी मोहिम चालवण्याची परवानगी मागितली आहे. पण यासाठीही संघर्ष करावा लागू शकतो असं पिंटू कांती भट्टाचार्जी बोलले आहेत. 

अनेक शरणार्थींनी सांगितलं आहे की, मोठं कुटुंब असल्याने कॅम्पमध्ये राहण्यासाठी त्यांना मदत मिळते. जिथे पाणी आणि अन्नासाठी संघर्ष चालू आहे, तिथे मुलांच्या मदतीने काम सोपं होऊन जातं. अनेक रोहिंग्या महिला जन्मदर कमी करणं पाप असल्याचं मानतात अशी माहिती कुटुंब योजनेतील स्वयंसेवक फरहाना सुल्ताना यांनी दिली आहे. फरहाना सुल्ताना यांनी सांगितलं की, 'हे लोक म्यानमारमध्येही कुटुंब योजनेसाठी डॉक्टरकडे जात नसत. आपल्याला आणि मुलांना नुकसान पोहोचवणारी औषधं दिली जातील अशी भीती त्यांना वाटत असे'. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या