शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

बांगलादेश - कंडोमची योजना फसल्याने आता रोहिंग्यांची नसबंदी करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 12:33 IST

बांगलादेशने त्यांच्याकडे आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची नसबंदी करण्याची योजना आखली आहे. रोहिंग्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही अपयश हाती आल्याने, अखेर नसबंदी करण्याची योजना आखण्यात आली आहे.

ठळक मुद्देबांगलादेशने त्यांच्याकडे आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची नसबंदी करण्याची योजना आखली आहेरोहिंग्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही अपयश हाती आल्याने घेतला निर्णयम्यानमारमध्ये झालेल्या हिंसेनंतर जवळपास सहा लाखहून जास्त रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे

ढाका - बांगलादेशने त्यांच्याकडे आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची नसबंदी करण्याची योजना आखली आहे. रोहिंग्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही अपयश हाती आल्याने, अखेर नसबंदी करण्याची योजना आखण्यात आली आहे. गेल्या महिन्यात रोहिंग्यांच्या कॅम्पमध्ये कंडोम वाटण्यात आले होते, मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. म्यानमारमध्ये झालेल्या हिंसेनंतर जवळपास सहा लाखहून जास्त रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे. 

म्यानमारहून शरणार्थी आलेल्या रोहिंग्यांनी अन्न आणि स्वच्छ पाण्यासारख्या सुविधांसाठी झगडावं लागत आहे. अशा परिस्थितीत रोहिंग्यांच्या संख्येवर नियंत्रण आणलं नाही, तर परिस्थिती अजून बिघडू शकते याची भीती अधिका-यांना वाटत आहे. कुटुंब नियोजन योजनेचे प्रमुख पिंटू कांती भट्टाचार्जी यांनी सांगितलं आहे की, रोहिंग्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासंबंधी अज्ञान आहे, त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे. 

एएफपीशी केलेल्या बातचीतमध्ये त्यांनी सांगितलं की, 'संपुर्ण समाजाला जाणुनबुजून अशिक्षत आणि मागासलेलं ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. अशा परिस्थितीत लोकसंख्या नियंत्रणासंबंधी जागरुकताही कमी आहे'. पिंटू कांती भट्टाचार्जी यांनी माहिती दिली की, 'रोहिंग्या कॅम्पमध्ये मोठी कुटुंबं असणं काही वेगळी गोष्ट नाही. काहीजणांना 19 हून जास्त मुलं आहेत, तर अनेक रोहिंग्यांना एकाहून जास्त पत्नी आहेत'.

जिल्हा कुटुंब योजनेच्या अधिका-यांनी कंडोम वाटण्यासाठी एक मोहिम सुरु केली होती. मात्र आतापर्यंत फक्त 550 कंडोम पॅकेट वाटण्यात आले आहेत. पण अनेक लोक कंडोमचा वापर करण्यास इच्छुक नाहीत. यामुळेच आम्ही सरकारकडे रोहिंग्या पुरुष आणि महिलांची नसबंदी मोहिम चालवण्याची परवानगी मागितली आहे. पण यासाठीही संघर्ष करावा लागू शकतो असं पिंटू कांती भट्टाचार्जी बोलले आहेत. 

अनेक शरणार्थींनी सांगितलं आहे की, मोठं कुटुंब असल्याने कॅम्पमध्ये राहण्यासाठी त्यांना मदत मिळते. जिथे पाणी आणि अन्नासाठी संघर्ष चालू आहे, तिथे मुलांच्या मदतीने काम सोपं होऊन जातं. अनेक रोहिंग्या महिला जन्मदर कमी करणं पाप असल्याचं मानतात अशी माहिती कुटुंब योजनेतील स्वयंसेवक फरहाना सुल्ताना यांनी दिली आहे. फरहाना सुल्ताना यांनी सांगितलं की, 'हे लोक म्यानमारमध्येही कुटुंब योजनेसाठी डॉक्टरकडे जात नसत. आपल्याला आणि मुलांना नुकसान पोहोचवणारी औषधं दिली जातील अशी भीती त्यांना वाटत असे'. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या