शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:26 IST

Pakistan Independence Day 2025: पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा केला.

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारेपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानी राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्व नेते पाकिस्तानच्या विजयाचा खोटा दावा करत आहेत. आज पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. या पार्श्वभूमीवर पीएम शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षासाठी भारत जबाबदार असल्याचे म्हटले. त्यानंतर, आता राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी काश्मीरचा उल्लेख करत भारताविरोधात गरळ ओकली.

पाकिस्तान विजयी झाल्याचा दावामीडिया रिपोर्ट्सनुसार, झरदारी म्हणाले, "भारताने हल्ला करून चूक केली, परंतु पाकिस्तानने धैर्याने आणि संयमाने उत्तर दिले. जगाला हे देखील कळले की, पाकिस्तानला शांतता हवी आहे. मात्र, देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षमही आहे. आम्ही कोणाच्याही दबावापुढे झुकत नाही आणि कधीही झुकणार नाही." ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला मात्र, झरदारी म्हणतात, "पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला. या विजयाने आम्हाला आठवण करुन दिली की, सर्वजण एकजूट आहोत."

काश्मीरबद्दल काय म्हटले?काश्मीरबद्दल बोलतना आसिफ अली झरदारी म्हणाले, "पाकिस्तान नेहमीच काश्मीरचे समर्थन करेल. आम्ही सर्वजण काश्मीरसोबत आहोत. काश्मीरींचे धाडस आणि न्यायासाठीचा संघर्ष आमच्या हृदयाच्या जवळ आहे. त्यांना आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत पाकिस्तान आपला अटळ राजनैतिक, नैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहील," अशी मुक्ताफळे झरदारी यांनी उधळली.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान