शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:19 IST

महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियाला भारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा  संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे.

भारत आणि रशियाने गुरुवारी आपला द्विपक्षीय व्यापार संतुलित पद्धतीने वाढवण्याचा आणि ऊर्जा सहकार्य कायम ठेवण्याचा संकल्प केला. याच वेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नॉन-टॅरिफ अडथळे आणि नियामक अडथळे लवकरात लवकर दूर करण्याची आवश्यकताही अधोरेखित केली. महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियालाभारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा  संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे.

रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबतच्या व्यापक चर्चेनंतर, संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले, "भारत-रशिया संबंध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगातील सर्वात प्रमुख संबंधांपैकी एक आहेत," असे आम्हाला वाटते. तसेच, भू-राजकीय परिस्थिती, जन भावना आणि नेतृत्व संपर्क हे याचे प्रमुख घटक राहतील," असेही जयशंकर म्हणाले. खरे तर, नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत,या दृष्टीने विविध पैलूंना अंतिम रूप देण्यासाठी जयशंकर मंगळवारी (१९ ऑगस्ट) मॉस्को येथे पोहोचले.

द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देणे लक्ष -जयशंकर आणि लावरोव्ह यांनी दहशतवादाचा सामना करण्याच्या पद्धतींवरही चर्चा केली. जयशंकर म्हणाले, "दहशतवादाच्या मुद्द्यावर, आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा संकल्प केला. मी कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद सहन न करण्याचा भारताचा द्दढ संकल्प आणि सीमा पार दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा आपला सार्वभौम अधिकार व्यक्त केला." 

द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा प्रयत्न - परराष्ट्रमंत्री म्हणाले, "आपण रशियाला भारताची निर्यात वाढवण्यासह संतुलित आणि शाश्वत पद्धतीने द्विपक्षीय व्यापार वाढवण्याच्या सामायिक महत्त्वाकांक्षेची पुष्टी केली. यासाठी नॉन-टेरिफ अडथळे आणि नियामक अडथळे त्वरित दूर करणे आवश्यक आहे. औषधनिर्माण, शेती आणि वस्त्रोद्योग यांसारख्या क्षेत्रात रशियाला भारतीय निर्यात वाढवल्याने विद्यमान असमतोल दूर होण्यास निश्चितच मदत होईल. 

जयशंकर पुढे म्हणाले, "खतांचा दीर्घकालीन पुरवठा सुनिश्चित करण्यासंदर्भातही पावले उचलण्यात आली आहेत. भारतीय कुशल कामगार, विशेषतः आयटी, बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगार, रशियाची कामगार गरज पूर्ण करू शकतात आणि सहकार्य अधिक बळकट करू शकतात." ते म्हणाले, व्यापार आणि गुंतवणुकीद्वारे ऊर्जा सहकार्य राखणेही महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिकाIndiaभारत