अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत असताना अफगाणिस्तानवर सत्ता गाजवणाऱ्या तालिबानने पाकिस्तानवर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली. तालिबानच्या सैन्याने कंधार सीमावर्ती भागात झुल्म-ए-लाल ऑपरेशन राबवून पाकिस्तानी लष्कराच्या तब्बल सात चौक्या ताब्यात घेतल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धयुद्ध घोषित केले आहे.
अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या २०५ व्या अल-बद्र कॉर्प्सच्या ६ व्या बॉर्डर उबैदाह ब्रिगेडने पाकिस्तानवर हल्ला केला. तसेच पाकिस्तानी सैनिकांना मागे ढकलत कंधार सीमेवरील ७ चौक्यांवर आपला ताबा मिळवला. या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा किंवा जखमी झाल्याचा दावाही अफगाणिस्तानने केला आहे.
तालिबानच्या दाव्यानुसार, दोन मोठे लष्करी तळ आता पूर्णपणे अफगाणिस्तानच्या नियंत्रणाखाली आले आहेत. सीमावर्ती भागातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या धमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अफगाण संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, २०१ व्या खालिद बिन अल-वालिद आर्मी कॉर्प्सच्या दुसऱ्या बॉर्डर ब्रिगेडने सीमेवर घिरट्या घालणारे पाकिस्तानी लष्कराचे एक ड्रोन पाडल्याचा दावा सोशल मीडियाद्वारे केला आहे.
पाकिस्तानचा अफगाणिस्तानला इशारा
याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे तालिबानला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "पाकिस्तानचा संयम आता पूर्णपणे संपला आहे. सीमेवरील वारंवार होणारे हल्ले आणि आमच्या सैनिकांचे बलिदान आता सहन केले जाणार नाही. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये उघड युद्ध सुरू झाले आहे."
Web Summary : Amidst Israel-Iran tensions, the Taliban reportedly attacked Pakistan, seizing seven border posts in the Kandahar region. Afghanistan claims numerous Pakistani casualties. Pakistan warns Afghanistan, declaring that its patience has ended and open war has begun following repeated attacks.
Web Summary : इजरायल-ईरान तनाव के बीच, तालिबान ने कथित तौर पर पाकिस्तान पर हमला किया, कंधार क्षेत्र में सात सीमा चौकियों पर कब्जा कर लिया। अफ़गानिस्तान ने कई पाकिस्तानी हताहतों का दावा किया है। पाकिस्तान ने अफ़गानिस्तान को चेतावनी दी, कहा कि उसका धैर्य समाप्त हो गया है और बार-बार हमलों के बाद खुला युद्ध शुरू हो गया है।