शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:47 IST

बांगलादेशमध्ये जेट विमान एका शाळेवरती क्रॅश झाले होते. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते.

बांगलादेशमध्ये हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान सोमवारी एका शाळेवरती कोसळले. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला. हे विमान ज्या शाळेवरती पडले त्या शाळेतील २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ढाकामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी भारतातून डॉक्टरांचे एक पथक जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

बर्न स्पेशालिस्ट डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक दिल्लीहून ढाक्याला जात आहे. अशा रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणारी आवश्यक वैद्यकीय उपकरणेही भारत पाठवत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.

पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

या विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला मदतीचे आश्वासन दिले. सोमवारी २१ जुलै रोजी दुपारी १.०६ वाजता हवाई दलाच्या एफ-७ बीजीआय प्रशिक्षण विमानाने उड्डाण केले. दुपारी १.३० वाजता हे विमान ढाका येथील उत्तरा येथील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीवर पडले. या भीषण अपघातानंतर शाळेच्या इमारतीला आग लागली.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. "भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय मदतीसह बर्न तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक ढाक्याला जात आहे", असं म्हटले आहे. गरज पडल्यास अशा रुग्णांना उपचारांसाठी भारतातही आणता येईल, असंही यामध्ये म्हटले आहे.

एका निवेदनात म्हटले आहे की, "ते रुग्णांच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन गरजेनुसार भारतात पुढील उपचार आणि विशेष काळजी घेण्याची शिफारस करतील. तिकडे गरजेनुसार वैद्यकीय पथके देखील पाठवता येतील. बांगलादेशला पाठवल्या जाणाऱ्या पथकात दिल्लीचे दोन डॉक्टर आहेत. त्यापैकी एक राम मनोहर लोहिया रुग्णालयातील आहे आणि दुसरा सफदरजंग रुग्णालयातील आहे. याशिवाय, बर्न विभागाच्या तज्ज्ञ परिचारिका देखील ढाक्याला जात आहेत.

उच्चस्तरीय समिती तपास करणार

बांगलादेश हवाई दलाने अपघाताची कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सोमवारी झालेल्या या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. या संकटात भारत बांगलादेशसोबत उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतairplaneविमानPlane Crashविमान दुर्घटना