शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात आता ९३ टक्के सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसार, हिंसेनंतर सुप्रिम कोर्टानं बदलली कोटा सिस्टिम   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 16:45 IST

Bangladesh News: आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगालादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबत कोटा सिस्टिम कायम ठेवण्याचा हायकोर्टाचा निर्णय रद्द केला.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगालादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबत कोटा सिस्टिम कायम ठेवण्याचा हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची ही व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आणलेली नाही. या निर्णयानुसार बांगलादेशमधील ९३ टक्के सरकारी नोकऱ्या ह्या आता गुणवत्तेनुसार भरल्या जातील. तर इतर घटकांसाठी ७ टक्के आरक्षण कायम ठेवण्यात आलं आहे. 

या निर्णय़ाबाबत ॲटॉर्नी जनरल एएम अमिनउद्दिन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने कोटा सिस्टिम कायम ठेवण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये सरकारी नोकऱ्यांमधील ९३ टक्के नोकऱ्या ह्या गुणवत्तेच्या आधारावर भरण्याचे आदेश दिले आहेत. तर १९७१ च्या मुक्तिसंग्रामामधील स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज आणि इतर वर्गातील व्यक्तींसाठी ७ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 

बांगलादेशमध्ये आतापर्यंत लागू असलेल्या कोटा प्रणालीनुसार ५६ टक्के सरकारी नोकऱ्या ह्या आरक्षित होत्या. यामधील ३० टक्के नोकऱ्या १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामामधील स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांसाठी, १० टक्के नोकऱ्या मागास प्रशासनिक जिल्ह्यांसाठी, १० टक्के नोकऱ्या महिलांसाठी, ५ टक्के नोकऱ्या जातीय अल्पसंख्याक समुहांसाठी आणि १ टक्के नोकऱ्या अपंगांसाठी आरक्षित होत्या. दरम्यान, स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी असलेल्या आरक्षणांविरोधात विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून  आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्याला हिंसक वळण लागले होते.

यापूर्वी २०१८ मध्येही या कोटा सिस्टिमविरोधात आंदोलन झालं होतं. त्यानंतर शेख हसिना सरकारने कोटा सिस्टिम हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या निर्णयाला स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मागच्या महिन्यात हायकोर्टाने सरकारचा हा निर्णय रद्द ठरवत कोटा सिस्टिम पुन्हा बहाल केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यामध्ये आतापर्यंत १३३ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३  हजारांहून अधिक जखमी झाले आहेत.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षणCourtन्यायालय