शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

बांगलादेशात आता ९३ टक्के सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसार, हिंसेनंतर सुप्रिम कोर्टानं बदलली कोटा सिस्टिम   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 16:45 IST

Bangladesh News: आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगालादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबत कोटा सिस्टिम कायम ठेवण्याचा हायकोर्टाचा निर्णय रद्द केला.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगालादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबत कोटा सिस्टिम कायम ठेवण्याचा हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची ही व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आणलेली नाही. या निर्णयानुसार बांगलादेशमधील ९३ टक्के सरकारी नोकऱ्या ह्या आता गुणवत्तेनुसार भरल्या जातील. तर इतर घटकांसाठी ७ टक्के आरक्षण कायम ठेवण्यात आलं आहे. 

या निर्णय़ाबाबत ॲटॉर्नी जनरल एएम अमिनउद्दिन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने कोटा सिस्टिम कायम ठेवण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये सरकारी नोकऱ्यांमधील ९३ टक्के नोकऱ्या ह्या गुणवत्तेच्या आधारावर भरण्याचे आदेश दिले आहेत. तर १९७१ च्या मुक्तिसंग्रामामधील स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज आणि इतर वर्गातील व्यक्तींसाठी ७ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 

बांगलादेशमध्ये आतापर्यंत लागू असलेल्या कोटा प्रणालीनुसार ५६ टक्के सरकारी नोकऱ्या ह्या आरक्षित होत्या. यामधील ३० टक्के नोकऱ्या १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामामधील स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांसाठी, १० टक्के नोकऱ्या मागास प्रशासनिक जिल्ह्यांसाठी, १० टक्के नोकऱ्या महिलांसाठी, ५ टक्के नोकऱ्या जातीय अल्पसंख्याक समुहांसाठी आणि १ टक्के नोकऱ्या अपंगांसाठी आरक्षित होत्या. दरम्यान, स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी असलेल्या आरक्षणांविरोधात विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून  आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्याला हिंसक वळण लागले होते.

यापूर्वी २०१८ मध्येही या कोटा सिस्टिमविरोधात आंदोलन झालं होतं. त्यानंतर शेख हसिना सरकारने कोटा सिस्टिम हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या निर्णयाला स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मागच्या महिन्यात हायकोर्टाने सरकारचा हा निर्णय रद्द ठरवत कोटा सिस्टिम पुन्हा बहाल केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यामध्ये आतापर्यंत १३३ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३  हजारांहून अधिक जखमी झाले आहेत.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षणCourtन्यायालय