शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

मलेशियामधील शाळेत गेल्या 20 वर्षातील भीषण आग, दोन कर्मचा-यांसह 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 1:40 PM

मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालांलपूर येथील एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे

ठळक मुद्देक्वालांलपूर येथील एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला तहफीज दारूल कुराण इत्तिफकिया असं या शाळेचं नाव मृतांमध्ये 23 लहान मुलं आणि 2 वॉर्डनचा समावेश आहेगेल्या 20 वर्षातील आगीच्या घटनांमधील ही सर्वात भयंकर आग असू शकते असा दावा अधिका-यांनी केला आहे

क्वालांलपूर, दि. 14 - मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालांलपूर येथील एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, तहफीज दारूल कुराण इत्तिफकिया असं या शाळेचं नाव आहे. जेव्हा आग लागली तेव्हा विद्यार्थी झोपेत होते. आगीमध्ये 23 विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 

अग्निशन दलाचे संचालक खिरुदीन द्रहमन  यांनी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 23 लहान मुलं आणि 2 वॉर्डनचा समावेश आहे. मृत पडलेल्या मुलांचं वय अद्याप कळलेलं नाही. शाळेला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका तासानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. यानंतर काही मुलांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही मुलांनी श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार केली होती. 

गेल्या 20 वर्षातील आगीच्या घटनांमधील ही सर्वात भयंकर आग असू शकते असा दावा अधिका-यांनी केला आहे. काही दिवसांपुर्वी, आगीच्या वारंवार घटना होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मलेशिया प्रशासनाने खासगी शाळांमधील सुरक्षेच्या उपायांवर चिंता व्यक्त केली होती. 

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 पासून ते आतापर्यंत आगीच्या 200 घटना घडल्या आहेत. प्रधानमंत्री नजीब रज्जाक यांनी ट्विट करत घटनेवर दुख: व्यक्त केलं आहे.  

टॅग्स :Schoolशाळा