शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

वर्चस्व कायम राखण्यास भारत उत्सुक, सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:03 IST

कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाला शनिवारी १० व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

ढाका : कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाला शनिवारी १० व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.अलीकडची कामगिरी व वर्चस्व याचा विचार करता स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघ १३ व्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानविरुद्ध प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. अलीकडच्या कालावधीत भारताने पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखालील संघ शेजारी राष्ट्राच्या संघावरील मजबूत पकड कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.सुपर फोरच्या पहिल्या लढतीत कोरियाविरुद्ध १-१ ची बरोबरी वगळता भारतीय संघाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी काही शानदार मैदानी गोल नोंदविले असून भारतीय संघाने लौकिकाप्रमाणे ‘वन टच’हॉकीचे प्रदर्शन केले आहे.कोरियाविरुद्धची लढत भारतीय संघाला सावध करण्यासाठी पुरेशी होती. भारतीय संघ नवे मुख्य प्रशिक्षक सोर्ड मारिने यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली स्पर्धा खेळत आहे. कोरियाविरुद्धचा अनिर्णीत निकाल भारतीय संघाला इशारा देण्यास पुरेसा ठरला. गुरुवारी खेळल्या गेलेल्या सुपर फोरच्या दुसºया लढतीत भारताने चमकदार कामगिरी करीत मलेशियाचा ६-२ ने पराभव केला. भारतीय संघाने सुपर फोरमध्ये एक विजय व एका अनिर्णीत निकालासह चार गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर मलेशिया (३ गुण), कोरिया (२ गुण) आणि पाकिस्तान (१ गुण) यांचा क्रमांक आहे. भारतीय संघला शनिवारी खेळल्या जाणाºया लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले तरी रविवारी खेळल्या जाणा-या अंतिम लढतीसाठी भारतीय संघाचे स्थान पक्के होईल. कारण भारतीय संघाचे गोलअंतर अन्य संघाच्या तुलनेत सरस आहे. पण, पाक संघाकडे गमावण्यासारखे काही नसल्यामुळे आम्हाला कमकुवत लेखू नका असा जगाला इशारा देण्यासाठी ते सज्ज झाले असतील. पाकिस्तानसाठी मात्र स्पर्धेची पुढील वाटचाल सोपी नाही. कारण अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवण्यासाठी त्यांना भारताविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि त्याचसोबत सुपर फोर फेरीतील अन्य सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.भारताचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग सोपा झाला आहे, पण पाकिस्तानचा कमी लेखण्याची चूक करता येणार नाही. सध्याच्या फॉर्मव्यतिरिक्त कुठल्याही भारत-पाक हॉकी सामन्याचा निकाल खेळाडू मैदानावरील दडपण कसे झुगारतात यावर अवलंबून असतो. भारतीय संघाला मात्र या लढतीत सकारात्मक निकालाची आशा आहे. या व्यतिरिक्त अन्य कुठलाही निकाल त्यांना पचनी पडणार नाही.भारतासाठी या स्पर्धेत सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आघाडीची फळी आहे. त्यात आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, एस.व्ही. सुनील, ललित उपाध्याय आणि युवा गुरजंत सिंग यांनी शानदार मैदानी गोल नोंदविले आहेत. सुपर फोरच्या अन्य लढतीत कोरियापुढे मलेशियाचे आव्हान राहील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतPakistanपाकिस्तान