शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Hockey World Cup 2018: भारत-नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व सामना आज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 5:03 AM

विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे.

भुवनेश्वर : विश्वचषक स्पर्धेत ४३ वर्षांनंतर सुवर्ण विजयाचे स्वप्न उराशी बाळगून घरच्या मैदानावर यशस्वी घोडदौड करीत असलेल्या भारतीय हॉकी संघापुढे खरे आव्हान गुरुवारी असेल. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे. प्रतिस्पर्धी संघाने गेल्या दोन सामन्यात तब्बल दहा गोल नोंदवून आक्रमक मनसुबे जाहीर केले.विश्व क्रमवारीत नेदरलँड चौथ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेच्या क गटात तीन सामन्यात दोन विजय आणि एक ड्रॉ यासह अव्वल स्थान मिळवले. नेदरलँडने ड गटात दुसरे स्थान गाठले. मंगळवारी क्रॉस ओव्हरमध्ये या संघाने कॅनडाचा पाच गोलने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती.खच्चून गर्दीचा अनुभव असलेल्या कलिंगा स्टेडियमवर चाहत्यांना भारताचा पुन्हा एक विजय पाहायचा आहे. भारताने याआधीचा अखेरचा साखळी सामना ८ डिसेंबर रोजी खेळला होता. प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्यानुसार खरी स्पर्धा बाद फेरीपासूनच आहे. भारतीय संघ नेदरलँड्सचे आव्हान परतविण्यास सज्ज असल्याचे त्यांचे मत आहे. प्रशिक्षकाच्या आत्मविश्वासामुळे भारताने तिसऱ्या स्थानावरील बेल्जियमला रोखले, हे विशेष.सिमरनजित सिंग, ललित उपाध्याय, मनदीप सिंग आणि ओडिशाचा ड्रॅग फ्लिकर अमित रोहिदास यांच्यासह सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. बचावफळीनेदेखील निराश केले नाही. अखेरच्या मिनिटाला कच खाण्याची वृत्तीदेखील खेळाडूंनी संपविली आहे.दुसरीकडे नेदरलँडने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १८ गोल नोंदविले. साखळीत मलेशियावर ७-० आणि पाकिस्तानवर ५-१ असा विजय नोंदविला. जर्मनीकडून मात्र त्यांचा १-४ असा पराभव झाला होता. प्रशिक्षक मॅक्स केलडास यांनी कबुली दिली की, ‘कलिंगावर भारताला नमविणे सोपे नाही. प्रतिस्पर्धी प्रेक्षकांचा दबाव असेल. पण माझे खेळाडू अनुभवी असून सामना जिंकण्यास सज्ज आहेत.’ लंडन ऑलिम्पिक २०१२ आणि विश्वकप २०१४ मध्ये नेदरलँडच्या महिला हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून देणारे प्रशिक्षक पुढे म्हणाले,‘आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करू आणि जिंकू.’ पहिल्यांदा नेदरलँड्सला नमविण्याचे लक्ष्यभारतीय संघाने गेल्या काही वर्षांत नेदरलँड्सविरुद्धचा रेकॉर्ड सुधारला आहे. मागील नऊ सामन्यात उभय संघ प्रत्येकी चार सामने जिंकले. एक सामना ड्रॉ झाला. विश्वचषकात दोन्ही संघ सहावेळा परस्परांविरुद्ध खेळले. सर्व सहा सामने नेदरलँडने जिंकले. १९७१ पासून सुरू झालेली ही स्पर्धा भारत १९७५ ला एकदाच जिंकला. १९९४ ला सर्वोत्कृष्ट कामगिरीसह भारत पाचव्या स्थानावर होता. दुसरीकडे स्पर्धेत सर्वात यशस्वी संघांपैकी एक मागचा उपविजेता नेदरलँड तीनवेळा (१९७३, १९९० आणि १९९८) विश्वविजेता राहिला आहे. गुरुवारी दुसरा उपांत्यपूर्व सामना जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात खेळला जाणार आहे.आक्रमक हॉकीत कुठलाही बदल होणार नाही. मोठ्या संघांविरुद्ध चांगला खेळ करण्याचा आम्हाला अनुभव आहे. नेदरलँड्सलाही हरवू शकतो. सध्याचा संघ मोठ्या संघाला घाबरणारा नसल्याने यंदा विश्वचषकातून रिकाम्या हाताने परतणार नाही, याचा मला विश्वास आहे.’- हरेंद्रसिंग, मुख्य प्रशिक्षक, भारत

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाIndiaभारत