शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

Hockey World Cup 2018: भारत-नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व सामना आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:04 IST

विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे.

भुवनेश्वर : विश्वचषक स्पर्धेत ४३ वर्षांनंतर सुवर्ण विजयाचे स्वप्न उराशी बाळगून घरच्या मैदानावर यशस्वी घोडदौड करीत असलेल्या भारतीय हॉकी संघापुढे खरे आव्हान गुरुवारी असेल. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे. प्रतिस्पर्धी संघाने गेल्या दोन सामन्यात तब्बल दहा गोल नोंदवून आक्रमक मनसुबे जाहीर केले.विश्व क्रमवारीत नेदरलँड चौथ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेच्या क गटात तीन सामन्यात दोन विजय आणि एक ड्रॉ यासह अव्वल स्थान मिळवले. नेदरलँडने ड गटात दुसरे स्थान गाठले. मंगळवारी क्रॉस ओव्हरमध्ये या संघाने कॅनडाचा पाच गोलने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती.खच्चून गर्दीचा अनुभव असलेल्या कलिंगा स्टेडियमवर चाहत्यांना भारताचा पुन्हा एक विजय पाहायचा आहे. भारताने याआधीचा अखेरचा साखळी सामना ८ डिसेंबर रोजी खेळला होता. प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्यानुसार खरी स्पर्धा बाद फेरीपासूनच आहे. भारतीय संघ नेदरलँड्सचे आव्हान परतविण्यास सज्ज असल्याचे त्यांचे मत आहे. प्रशिक्षकाच्या आत्मविश्वासामुळे भारताने तिसऱ्या स्थानावरील बेल्जियमला रोखले, हे विशेष.सिमरनजित सिंग, ललित उपाध्याय, मनदीप सिंग आणि ओडिशाचा ड्रॅग फ्लिकर अमित रोहिदास यांच्यासह सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. बचावफळीनेदेखील निराश केले नाही. अखेरच्या मिनिटाला कच खाण्याची वृत्तीदेखील खेळाडूंनी संपविली आहे.दुसरीकडे नेदरलँडने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १८ गोल नोंदविले. साखळीत मलेशियावर ७-० आणि पाकिस्तानवर ५-१ असा विजय नोंदविला. जर्मनीकडून मात्र त्यांचा १-४ असा पराभव झाला होता. प्रशिक्षक मॅक्स केलडास यांनी कबुली दिली की, ‘कलिंगावर भारताला नमविणे सोपे नाही. प्रतिस्पर्धी प्रेक्षकांचा दबाव असेल. पण माझे खेळाडू अनुभवी असून सामना जिंकण्यास सज्ज आहेत.’ लंडन ऑलिम्पिक २०१२ आणि विश्वकप २०१४ मध्ये नेदरलँडच्या महिला हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून देणारे प्रशिक्षक पुढे म्हणाले,‘आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करू आणि जिंकू.’ पहिल्यांदा नेदरलँड्सला नमविण्याचे लक्ष्यभारतीय संघाने गेल्या काही वर्षांत नेदरलँड्सविरुद्धचा रेकॉर्ड सुधारला आहे. मागील नऊ सामन्यात उभय संघ प्रत्येकी चार सामने जिंकले. एक सामना ड्रॉ झाला. विश्वचषकात दोन्ही संघ सहावेळा परस्परांविरुद्ध खेळले. सर्व सहा सामने नेदरलँडने जिंकले. १९७१ पासून सुरू झालेली ही स्पर्धा भारत १९७५ ला एकदाच जिंकला. १९९४ ला सर्वोत्कृष्ट कामगिरीसह भारत पाचव्या स्थानावर होता. दुसरीकडे स्पर्धेत सर्वात यशस्वी संघांपैकी एक मागचा उपविजेता नेदरलँड तीनवेळा (१९७३, १९९० आणि १९९८) विश्वविजेता राहिला आहे. गुरुवारी दुसरा उपांत्यपूर्व सामना जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात खेळला जाणार आहे.आक्रमक हॉकीत कुठलाही बदल होणार नाही. मोठ्या संघांविरुद्ध चांगला खेळ करण्याचा आम्हाला अनुभव आहे. नेदरलँड्सलाही हरवू शकतो. सध्याचा संघ मोठ्या संघाला घाबरणारा नसल्याने यंदा विश्वचषकातून रिकाम्या हाताने परतणार नाही, याचा मला विश्वास आहे.’- हरेंद्रसिंग, मुख्य प्रशिक्षक, भारत

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाIndiaभारत