शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

भारतीय हॉकी संघाची दिवाळी भेट, मलेशियाचा उडवला ६-२ गोलने धुव्वा, आशिया चषक हॉकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 01:36 IST

भारतीय हॉकी संघाने आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशियावर ६-२ गोलने धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने चाहत्यांना अनोखी दिवाळी भेट दिली.

ढाका : भारतीय हॉकी संघाने आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशियावर ६-२ गोलने धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने चाहत्यांना अनोखी दिवाळी भेट दिली. आता भारताची लढत शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.भारतीय हॉकी संघाने जबरदस्त आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची उसंत मिळू न देता तब्बल५ मैदानी गोल केले. भारताकडून हे ५ मैदानी गोल आकाशदीपसिंग (१५ व्या मिनिटाला), एस. के. उथप्पा (२४ व्या मिनिटाला), गुरजंतसिंग (३३ व्या मिनिटाला), एस. व्ही. सुनील (४० व्या) आणि सरदार सिंग (६० व्या मिनिटाला) यांनी केले. हरमनप्रीतने १९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केला.मलेशिया संघाकडून रझी रहीम याने ५० व्या आणि रमदान रोस्ली याने ५९ व्या मिनिटाला गोल केला. विशेष म्हणजे या स्पर्धेत मलेशियाचे रेकॉर्ड खूप प्रभावी होते. त्यांनी आतापर्यंत सर्वच सामने जिंकले असून, हा त्यांचा पहिला पराभव ठरला. दुसरीकडे भारतीय संघाने आजच्या विजयाच्या बळावर मलेशियाविरुद्ध हिशेब चुकता केला. याआधी भारताला अझलन शाह चषकात ०-१ आणि लंडनयेथील हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल्समध्ये २-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. या विजयामुळे भारतीय संघ सुपर ४ स्टेजमध्ये अव्वल स्थानी आला आहे. याआधी काल भारताने कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखले होते. तत्पूर्वी, अन्य लढतीत कोरिया आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १-१ गोलने बरोबरीत सुटली. आज मात्र, भारत विजय मिळवण्याच्या वज्र निर्धाराने खेळला. कर्णधार मनप्रीतसिंग याने दिलेल्या सुरेख पासवर आकाशदीपसिंगने १५ व्या मिनिटाला शक्तिशाली शॉट मारताना भारतीय संघाच्या गोलचे खाते उघडले. त्यानंतर हरमनप्रीतने १९ व्या भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली. भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत शक्तिशाली फ्लिकद्वारे गोलमध्ये रूपांतर केले. (वृत्तसंस्था)२४ व्या मिनिटाला एस. के. उथप्पा याने तिसरा गोल करीत भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उथप्पा, ललित आणि आकाशदीप यांच्या साथीने गुरजंतसिंगने भारताला ४-० आणि सुनीलने ५-० अशी भारताची स्थिती आणखी भक्कम केली.दरम्यान मलेशियाला आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले; परंतु त्यांना फक्त एकाच पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले. त्यांच्या रझी याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर भारताचा सहावा गोल कर्णधार सरदारसिंग याने आकाशदीपच्या साथीने करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.04 या विजयासह भारताने सुपर फोरमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. दोन लढतीत भारताचे चार गुण झाले.05भारताच्या आक्रमक धोरणामुळे तिसºया क्वार्टरनंतर मलेशियाविरोधात पाच गोलची नोंद केली. सुपर फोरमध्ये भारताचा पुढचा सामना शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.नियमानुसार अग्रक्रमांकावर असलेले दोन संघ अंतिम सामना खेळतील व ३ व ४ क्रमांकाचे संघ तिस-या क्रमांकासाठी रविवारी खेळतील.या विजयाने भारताने अझलन शाह हॉकी स्पर्धा आणि वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत