शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

CWG 2018 : फक्त सात सेंकदात पाकिस्तानने हिरावला भारताचा विजय, सामना बरोबरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 16:58 IST

पाकिस्तानने मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावल्यामुळं सामना बरोबरीत सुटला आहे.  

गोल्ड कोस्ट : पाकिस्तानने मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावल्यामुळं सामना बरोबरीत सुटला आहे.  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानचा पहिला सामना हा 2-2 असा बरोबरीत सुटला आहे. शेवटच्या क्षणाला भारताने पाकिस्तानकडून पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्यामुळे हा सामना बरोबरीत सोडवण्यात आला. या सामन्यात भारताने सुरूवातीपासून 2-0 अशी आघाडी मिळवली होती पण मोक्याच्या क्षणी पाकिस्तानने दोन गोल करत हा सामना बरोबरीत सोडला. 

अपेक्षेप्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आज झालेल्या सामन्याला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. पहिल्या क्षणांपासून भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानी खेळाडूंनीही भारताला  टक्कर दिली. अखेर एस. व्ही. सुनीलने दिलेल्या पासवर नवोदीत दिलप्रीत सिंहने 39 व्या मिनीटाला बॉल गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर पाकिस्तानवर दबाव टाकण्याची पुरेपूर संधी भारताकडे उपलब्ध होती, मात्र त्या संधीचा लाभ उठवणं भारतीय खेळाडूंना जमलं नाही. पहिल्या सत्रात भारताने पाकिस्तानवर 2-0 आशी भक्कम आघाडी घेतली होती. 

पण दुसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्यात भारताचे खेळाडू सपशेल अपयशी ठरले.  मध्यंतरीच्या काळात भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या अनेक संधी चालून आल्या होत्या, मात्र भरवशाच्या रुपिंदरपाल सिंहने आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. 

अखेरच्या क्षणी तिसऱ्या पंचांनी दोन वादग्रस्त निर्णय देत पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर बहाल केला. या संधीचा फायदा घेत अली मुबाशिरने श्रीजेशला चकवत पाकिस्तानचा दुसरा गोल केला. सामना संपल्यानंतर भारताचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी तिसऱ्या पंचांकडे शेवटच्या दोन निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत आपला निषेध नोंदवला. मात्र पहिल्याच सामन्यात बरोबरी पदरी पडल्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८IndiaभारतPakistanपाकिस्तानHockeyहॉकी