शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आशिया चषक महिला हॉकी: चीनवर विजयासाठी भारत सज्ज, आज अंतिम सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 3:34 AM

विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यास संघ उत्सुक आहे.

काकामिगहरा, जपान : विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यास संघ उत्सुक आहे.भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यात विजय मिळवाला. उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्यफेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्या संघाने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०,चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते.भारतीय संघ याआधी २००९ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते. गेल्या वेळी २०१३ मध्ये क्वालालंपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत तिसºया स्थानी होता. भारताने आतापर्यंत २००४ मध्ये एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.भारताने पुढच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या महिला विश्वचषकासाठीची पात्रता मिळवली आहे. कर्णधार राणी रामपॉल हिने सांगितले की आम्ही या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठीच उद्याच्या सामन्यात खेळणार आहोत. आम्ही आशिया विजेते बनून विश्वचषकात जागा मिळवण्यास उत्सुक आहोत. पुरुष संघाने आशिया चषक जिंकल्याने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.ड्रेसिंग रूमचे वातावरण खूपच चांगले आहे. आम्ही उत्साहित आहोत आणि अंतिम सामन्यासाठी पूर्ण तयार आहोत.’राणी पुढे म्हणाली की, ‘जपान विरोधातील सामना खूूपच चांगला होता. चांगली सुरुवात सगळ्यात जास्त गरजेची असते. संघातील प्रत्येक खेळाडूने या योगदान दिले आहे. आमच्या प्रशिक्षकांनी बनवलेल्या रणनीतीनुसार आम्हाला खेळ करावा लागेल आणि चुका होणार नाही याची काळजीदेखील घ्यावी लागेल. ’राणीने सांगितले, ‘आम्हाला माहीत आहे की, चीनचा संघ चांगला आहे आणि उलटफेर करू शकतो.(वृत्तसंस्था)आम्ही त्यांना आधी पराभूत केले आहे. म्हणून आताही करू शकतो, असे नाही. आम्ही रणनीती तयार केली आहे. आणि आमचे त्यावरच फोकस आहे.’गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियन्स चषकात चीनने भारतात साखळी फेरीत पराभूत केले होते. मात्र त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने चीनवर विजय मिळवला होता.

टॅग्स :Hockeyहॉकी