शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

आशिया कप हॉकी - भारताने मलेशियाचा उडवला धुव्वा, 6-2 ने केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 20:16 IST

ढाक्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी जबरदस्त आक्रमक खेळ करत मलेशियाला अक्षरश: लोळवले.

ठळक मुद्देदक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात केलेल्या चुकांमधून भारतीय संघाने धडा घेतल्याचे दिसून आले.

ढाका - ढाक्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी जबरदस्त आक्रमक खेळ करत मलेशियाला अक्षरश: लोळवले. भारताच्या भन्नाट खेळासमोर मलेशियन संघ पुरता निष्प्रभ ठरला. भारतीय हॉकी संघाने 6-2 इतक्या मोठया फरकाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताचे दोन सामन्यात चार गुण झाले असून, भारत गटात अव्वल स्थानावर आहे. काल दक्षिण कोरियाविरुध्दच्या लढतीत भारताल १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. अखेरच्या मिनिटाला गुरजंत सिंगने निर्णायक गोल करुन भारताचा पराभव टाळला होता. 

दक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात केलेल्या चुकांमधून भारतीय संघाने धडा घेतल्याचे दिसून आले. आक्रमक हॉकी खेळताना आपण किती धोकादायक आहोत ते भारताने आजच्या सामन्यातून दाखवून दिले. सुरुवातीपासून भारताने मलेशियावर वर्चस्व गाजवले. भारताने पाच मैदानी गोल केले. 

आकाशदीप सिंगने (14वे मिनिट), एसके उथाप्पा (24 वे मिनिट), गुरजत सिंग (33 वे मिनिट), एसव्ही सुनिल (40 वे मिनिट) आणि सरदार सिंग (60 वे मिनिट) यांनी पाच मैदानी गोल केले. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये बदलला. मलेशियाकडून राझी रहीमने (50 व्या मिनिटाला) तर रामादान रोसीलने (59 व्या मिनिटाला) गोल केला. मलेशियाने शेवटच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले तो पर्यंत उशीर झाला होता. 

दक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर तिस-या क्वार्टरच्या शेवटच्या चार मिनिटांमध्ये जाँग जुन याने अप्रतिम गोल करत दक्षिण कोरियाला १-० अशी आघाडी मिळवूण दिली.यानंतर कोरियन खेळाडूंनी भक्कम बचाव करत भारताला प्रचंड दबावाखाली आणले. भारतीयांनी गोल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कोरियन बचाव भेदण्यात त्यांन सातत्याने अपयश आले. अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्याने कोरिया अनपेक्षित निकाल नोंदवणार हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु, अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताने साहसी चाल खेळताना गोलरक्षक हटवून सर्व खेळाडूंनिशी कोरियावर हल्ला केला आणि केवळ एक मिनिट शिल्लक असताना गुरजंत सिंगने निर्णायक गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. 

टॅग्स :Hockeyहॉकी