शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

आशिया कप हॉकी - भारताने मलेशियाचा उडवला धुव्वा, 6-2 ने केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 20:16 IST

ढाक्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी जबरदस्त आक्रमक खेळ करत मलेशियाला अक्षरश: लोळवले.

ठळक मुद्देदक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात केलेल्या चुकांमधून भारतीय संघाने धडा घेतल्याचे दिसून आले.

ढाका - ढाक्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी जबरदस्त आक्रमक खेळ करत मलेशियाला अक्षरश: लोळवले. भारताच्या भन्नाट खेळासमोर मलेशियन संघ पुरता निष्प्रभ ठरला. भारतीय हॉकी संघाने 6-2 इतक्या मोठया फरकाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताचे दोन सामन्यात चार गुण झाले असून, भारत गटात अव्वल स्थानावर आहे. काल दक्षिण कोरियाविरुध्दच्या लढतीत भारताल १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. अखेरच्या मिनिटाला गुरजंत सिंगने निर्णायक गोल करुन भारताचा पराभव टाळला होता. 

दक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात केलेल्या चुकांमधून भारतीय संघाने धडा घेतल्याचे दिसून आले. आक्रमक हॉकी खेळताना आपण किती धोकादायक आहोत ते भारताने आजच्या सामन्यातून दाखवून दिले. सुरुवातीपासून भारताने मलेशियावर वर्चस्व गाजवले. भारताने पाच मैदानी गोल केले. 

आकाशदीप सिंगने (14वे मिनिट), एसके उथाप्पा (24 वे मिनिट), गुरजत सिंग (33 वे मिनिट), एसव्ही सुनिल (40 वे मिनिट) आणि सरदार सिंग (60 वे मिनिट) यांनी पाच मैदानी गोल केले. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये बदलला. मलेशियाकडून राझी रहीमने (50 व्या मिनिटाला) तर रामादान रोसीलने (59 व्या मिनिटाला) गोल केला. मलेशियाने शेवटच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले तो पर्यंत उशीर झाला होता. 

दक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर तिस-या क्वार्टरच्या शेवटच्या चार मिनिटांमध्ये जाँग जुन याने अप्रतिम गोल करत दक्षिण कोरियाला १-० अशी आघाडी मिळवूण दिली.यानंतर कोरियन खेळाडूंनी भक्कम बचाव करत भारताला प्रचंड दबावाखाली आणले. भारतीयांनी गोल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कोरियन बचाव भेदण्यात त्यांन सातत्याने अपयश आले. अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्याने कोरिया अनपेक्षित निकाल नोंदवणार हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु, अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताने साहसी चाल खेळताना गोलरक्षक हटवून सर्व खेळाडूंनिशी कोरियावर हल्ला केला आणि केवळ एक मिनिट शिल्लक असताना गुरजंत सिंगने निर्णायक गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. 

टॅग्स :Hockeyहॉकी