शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

रस्त्यावर सरण रचत घेतला अंत्यविधीचा पवित्रा; स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 31, 2024 12:49 IST

गावाला नाही स्मशानभूमी, त्यामुळे अंत्यविधी शेतांमध्ये पार पाडावा लागतो, मात्र, शेती नसलेल्या कुटुंबांची मोठी अडचण होत आहे

- दिलीप कावरखेगोरेगाव : सेनगाव तालुक्यातील नागमाथा येथील स्मशानभूमीचा प्रश्न दुर्लक्षित असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी गोरेगाव ते रिसोड मार्गावर सरण रचत गावात मरण पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत ५० ते ६० कुटुंब संख्या असलेल्या नागमाथा गावात स्मशानभूमीचा प्रश्न पूर्वीपासून दुर्लक्षित आहे. परिणामी गावात मरण पावलेल्या व्यक्तींचा अंत्यविधी शेतांमध्ये पार पाडावा लागत असून, शेती नसलेल्या कुटुंबांना इतर शेतकऱ्यांना विनंती करीत त्यांच्या शेतात अंत्यविधी करावा लागतो. अशा विदारक परिस्थिचा सामाना गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांकडून वेळोवेळी स्मशानभूमीची मागणी केली. मात्र केवळ आश्वासन दिले जात असून प्रत्यक्षात मात्र कायम दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी स्मशानभूमीचा प्रश्न कायम राहिला आहे.

३१ ऑगस्ट रोजी नागमाथा येथील त्र्यबंक महादजी गुव्हाडे (७०) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा? असा प्रश्न निर्माण झाला असता नागमाथा येथील ग्रामस्थांकडून गोरेगाव ते रिसोड मार्गावरच सरण रचत रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला. सकाळी ७ वाजल्यापासून नागमाथा गावातील सर्वच महिला व पुरुष ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने गोरेगाव, रिसोड केंद्रा बु. कडे जाणाऱ्या तीन ते चार एसटी बस गाड्यांसह टॅक्सी, जीप, दुचाकी आदी वाहने जागेवर उभी राहिल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

ही माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांसह तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी, राहुल खिल्लारीसह काही कार्यकर्त्यांनी येथे येऊन ग्रामस्थांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. संबंधित अधिकाऱ्यांकडून स्मशानभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी नसता मयतांचे मुले व बाहेर गावातील नातेवाईक आल्यानंतर रस्त्यावरच अंत्यविधी करणार असल्याचा पवित्रा आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी घेतला. सकाळी ११:३० पर्यंत ग्रामस्थ रस्त्यावरच ठाण मांडून होते.

जागेची पाहणी सुरुसकाळी ११:३० च्या सुमारास नायब तहसीलदार कारगुडे, ग्रामविकास अधिकारी जी.एन. सालेगावकर, सहायक पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, तलाठी प्रदीप इंगोले, सरपंच पती दासराव कावरखे आदी गावात पोहोचले. स्मशानभूमीसाठी जागेची पाहणी करण्याची धडपड यावेळी सुरु होती.

सर्वजण केवळ आश्वासने देऊन मोकळेपूर्वीपासून स्मशानभूमीचा प्रश्न दुर्लक्षित असल्याने शेतामध्ये अंत्यविधी करावा लागतो; परंतु ज्या कुटुंबांना शेती नाही त्यांनी अंत्यविधी कुठे करावा? असा प्रश्न आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी केवळ आश्वासने देऊन मोकळे होत आहेत.- कोंडीबा काशीराम खटके, ग्रामस्थ नागमाथा

 रस्त्यावरच अंत्यविधी करणारमागणी करूनही गावात स्मशानभूमी उपलब्ध केली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी, बीडीओ, तहसीलदार आदींना संपर्क साधला मात्र तीन तासापासून अद्याप वरील पैकी कोणीही आले नाही. स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न नाही सोडवल्यास दुपारी दिड वाजेच्या सुमारास रस्त्यावरच अंत्यविधी केला जाणार आहे.- अनिल तिखडके, ग्रामस्थ नागमाथा

टॅग्स :HingoliहिंगोलीagitationआंदोलनDeathमृत्यू