शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:28 PM

वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्कहयातनगर : वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत.  पावसाच्या लहरीपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, हळद इ. पिके हातची गेली. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघाला नाही. सिंचनासाठी पाणीच नसल्याने आता शेवटच्या टप्प्यात असलेली हळदही करपून जात आहे.आतापर्यंत हळदीवर केलेला खर्च वाया जाण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकरी हळदीला टँकरने पाणी देऊन जगवण्याची धडपड करत असल्याचे चित्र दिसत आहे.दुष्काळाने पाणीप्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी चिंतातुर दिसत आहेत. शेतकरी राजू शेख यांच्याकडे सिंचनासाठी विहीर व बोअरवेल आहेत. पण डिसेंबरमध्येच जलस्त्रोत आटल्याने आता विकतचे पाणी देऊन पिके वाचवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शेख यांनी तीन एकर हळदीची लागवड केली होती.पाण्याअभावी अडीच एकर हळद करपून गेली. वीस गुंठे हळदीची जोपासना ते पुढच्या वर्षी बेण्यासाठी करत आहेत.यंदा पिकांवर विविध रोगांचे प्रादुर्भाव झाल्याने खर्च प्रचंड वाढला. उत्पन्नाची आशाही मावळली आहे. शासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी राजू शेख यांनी केली आहे.बेण्यासाठी टँकरने पाणी४यंदा तीन एकर जमिनीवर हळद लागवड केली आहे. पाऊस कमी झाल्याने विहीर, बोअरला खडा लागला. त्यामुळे पाण्याअभावी अडीच एकर हळद सोडून दिली. पुढच्या वर्षी बेण्यासाठी हळद रहावी म्हणून अर्धा एकर हळदीला टँकरने पाणी देऊन जतन करत असल्याचे हयातनगर येथील शेतकरी राजू शेख म्हणाले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईFarmerशेतकरी