शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थ-वनविभाग संघर्ष पेटला; अतिक्रमण काढताना ग्रामस्थांकडून दगडफेक; पथकाचा हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 19:45 IST

अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला.

हिंगोली : तालुक्यातील पातोंडा येथे वनविभागाच्या ११ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन व पोलिसांच्या संयुक्त पथकावर ग्रामस्थांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. तरीही जमाव पांगत नसल्याने वन अधिकाऱ्यांनी तीनदा हवेत गोळीबार केल्याची घटना ५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात ११ वन अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून ५० शेतकरीही जखमी झाले.

पातोंडा येथील वनजमिनीवर अतिक्रमण केल्याने ११ शेतकऱ्यांना वनविभागाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. २२ डिसेंबर, २८ डिसेंबरला नोटिसा देवून पुन्हा १ जानेवारीला नोटिसा तामिल केल्या होत्या. २ जानेवारीपासून अतिक्रमण काढण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले होते. त्यानंतर हे अतिक्रमण हटविण्यासाठी वन विभाग व अतिक्रमणधारकांसह ग्रामस्थांची बैठक २ जानेवारीला झाली. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मालकीचे काही पुरावे असल्यास सादर करण्यास सांगण्यात आले. ४ जानेवारीला पुरावे सादर करण्यासाठी पुन्हा बैठक झाली. ५ रोजी वन व पोलीस प्रशासनातील कर्मचारी मशिनसह दाखल झाले तेव्हा ग्रामस्थ तेथे जमले. अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला. मात्र जमाव आक्रमक होत असल्याने शेवटी वन अधिकाऱ्यांनी तीन वेळा हवेत गोळीबार केल्याने जमाव पांगला. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वसमतचे विनोद जांभुळे हेही जखमी झाले. शिवाय ९ कर्मचारीही जखमी असून यात एक महिला कर्मचारी आहे. तर ग्रामस्थांपैकीही जवळपास ५० जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी अनेकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रात्री साडेसातच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी बासंबा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी रवाना झाले होते. याबाबत विचारले असता वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक म्हणाले, अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी बासंबा पोलीस ठाण्यात जाणार आहोत.

या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, वनिवभागाच्या जमिनीवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थांना तीनदा संधी दिली. आज प्रत्यक्ष अतिक्रमण हटविताना ग्रामस्थांनी दगडफेक केली. लाठीचार्ज करूनही जमाव पांगत नव्हता. त्यामुळे हवेत गोळीबार करून वन अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ ठरला. वन विभागाचे ११ कर्मचारी व जवळपास तेवढेच ग्रामस्थ जखमी झाले आहेत. अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर गुन्हा नोंद केला जाणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी