शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

ग्रामस्थ-वनविभाग संघर्ष पेटला; अतिक्रमण काढताना ग्रामस्थांकडून दगडफेक; पथकाचा हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 19:45 IST

अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला.

हिंगोली : तालुक्यातील पातोंडा येथे वनविभागाच्या ११ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन व पोलिसांच्या संयुक्त पथकावर ग्रामस्थांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. तरीही जमाव पांगत नसल्याने वन अधिकाऱ्यांनी तीनदा हवेत गोळीबार केल्याची घटना ५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात ११ वन अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून ५० शेतकरीही जखमी झाले.

पातोंडा येथील वनजमिनीवर अतिक्रमण केल्याने ११ शेतकऱ्यांना वनविभागाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. २२ डिसेंबर, २८ डिसेंबरला नोटिसा देवून पुन्हा १ जानेवारीला नोटिसा तामिल केल्या होत्या. २ जानेवारीपासून अतिक्रमण काढण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले होते. त्यानंतर हे अतिक्रमण हटविण्यासाठी वन विभाग व अतिक्रमणधारकांसह ग्रामस्थांची बैठक २ जानेवारीला झाली. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मालकीचे काही पुरावे असल्यास सादर करण्यास सांगण्यात आले. ४ जानेवारीला पुरावे सादर करण्यासाठी पुन्हा बैठक झाली. ५ रोजी वन व पोलीस प्रशासनातील कर्मचारी मशिनसह दाखल झाले तेव्हा ग्रामस्थ तेथे जमले. अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला. मात्र जमाव आक्रमक होत असल्याने शेवटी वन अधिकाऱ्यांनी तीन वेळा हवेत गोळीबार केल्याने जमाव पांगला. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वसमतचे विनोद जांभुळे हेही जखमी झाले. शिवाय ९ कर्मचारीही जखमी असून यात एक महिला कर्मचारी आहे. तर ग्रामस्थांपैकीही जवळपास ५० जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी अनेकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रात्री साडेसातच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी बासंबा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी रवाना झाले होते. याबाबत विचारले असता वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक म्हणाले, अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी बासंबा पोलीस ठाण्यात जाणार आहोत.

या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, वनिवभागाच्या जमिनीवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थांना तीनदा संधी दिली. आज प्रत्यक्ष अतिक्रमण हटविताना ग्रामस्थांनी दगडफेक केली. लाठीचार्ज करूनही जमाव पांगत नव्हता. त्यामुळे हवेत गोळीबार करून वन अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ ठरला. वन विभागाचे ११ कर्मचारी व जवळपास तेवढेच ग्रामस्थ जखमी झाले आहेत. अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर गुन्हा नोंद केला जाणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी