शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थ-वनविभाग संघर्ष पेटला; अतिक्रमण काढताना ग्रामस्थांकडून दगडफेक; पथकाचा हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 19:45 IST

अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला.

हिंगोली : तालुक्यातील पातोंडा येथे वनविभागाच्या ११ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन व पोलिसांच्या संयुक्त पथकावर ग्रामस्थांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. तरीही जमाव पांगत नसल्याने वन अधिकाऱ्यांनी तीनदा हवेत गोळीबार केल्याची घटना ५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात ११ वन अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून ५० शेतकरीही जखमी झाले.

पातोंडा येथील वनजमिनीवर अतिक्रमण केल्याने ११ शेतकऱ्यांना वनविभागाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. २२ डिसेंबर, २८ डिसेंबरला नोटिसा देवून पुन्हा १ जानेवारीला नोटिसा तामिल केल्या होत्या. २ जानेवारीपासून अतिक्रमण काढण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले होते. त्यानंतर हे अतिक्रमण हटविण्यासाठी वन विभाग व अतिक्रमणधारकांसह ग्रामस्थांची बैठक २ जानेवारीला झाली. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मालकीचे काही पुरावे असल्यास सादर करण्यास सांगण्यात आले. ४ जानेवारीला पुरावे सादर करण्यासाठी पुन्हा बैठक झाली. ५ रोजी वन व पोलीस प्रशासनातील कर्मचारी मशिनसह दाखल झाले तेव्हा ग्रामस्थ तेथे जमले. अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला. मात्र जमाव आक्रमक होत असल्याने शेवटी वन अधिकाऱ्यांनी तीन वेळा हवेत गोळीबार केल्याने जमाव पांगला. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वसमतचे विनोद जांभुळे हेही जखमी झाले. शिवाय ९ कर्मचारीही जखमी असून यात एक महिला कर्मचारी आहे. तर ग्रामस्थांपैकीही जवळपास ५० जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी अनेकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रात्री साडेसातच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी बासंबा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी रवाना झाले होते. याबाबत विचारले असता वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक म्हणाले, अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी बासंबा पोलीस ठाण्यात जाणार आहोत.

या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, वनिवभागाच्या जमिनीवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थांना तीनदा संधी दिली. आज प्रत्यक्ष अतिक्रमण हटविताना ग्रामस्थांनी दगडफेक केली. लाठीचार्ज करूनही जमाव पांगत नव्हता. त्यामुळे हवेत गोळीबार करून वन अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ ठरला. वन विभागाचे ११ कर्मचारी व जवळपास तेवढेच ग्रामस्थ जखमी झाले आहेत. अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर गुन्हा नोंद केला जाणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी