शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नव्या जोडणीला दोन शेतकऱ्यांत एक डीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:19 IST

महावितरणकडे यापूर्वी कोटेशन भरूनही प्रतीक्षा यादीत असलेल्या ५ हजारांवर कृषीपंपधारकांना आता जोडणी मिळणार आहे. कृषीपंपाच्या एचपीनुसार एका किंवा दोन जोडण्यांना एक डीपी देण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले.

ठळक मुद्दे९ निविदा मंजूर सहा कामांची एकत्रित फेरनिविदा निघणार, पाच हजार नवीन जोडण्या देताना नवा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणकडे यापूर्वी कोटेशन भरूनही प्रतीक्षा यादीत असलेल्या ५ हजारांवर कृषीपंपधारकांना आता जोडणी मिळणार आहे. कृषीपंपाच्या एचपीनुसार एका किंवा दोन जोडण्यांना एक डीपी देण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांनी कोटेशन भरले म्हणून अवैध जोडण्या केल्या आहेत. त्यामुळे भार वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध डीपींवर अतिरिक्त ताण पडत आहे. जिल्ह्यात कोटेशन भरूनही जोडणी न मिळालेले पाच हजारांवर शेतकरी आहेत. अशा प्रतीक्षा यादीतील पहिल्या पाच हजार शेतकºयांना जोडणी देण्यात येणार आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदांपैकी ९ निविदा मंजूर झाल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. तर आणखी सहा निविदा एकत्रित करून वरिष्ठ स्तरावरून त्याची फेरनिविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात या नवीन जोडण्यांना डीपीही कमी क्षमतेचे राहणार असून ते एका किंवा दोन जोडण्यांसाठी स्वतंत्र राहतील. या डीपीवर अतिरिक्त जोडणीच करणे शक्य राहणार नाही. शिवाय ती झाल्यास संबंधित शेतकºयालाच त्याचा त्रास होणार असल्याने तो करू देणार नाही.या योजनेमुळे वीजचोरीला आळा बसणार असून जवळपास ५१0५ नवीन जोडण्यांना असे डीपी मंजूर झाले. त्यात १0 केव्हीएच्या डीपींची संख्या ४२९७ एवढी राहणार आहे. तर १६ केव्हीएचे ५७ असतील. कृषीपंपाच्या एचपीनुसार त्यावरील जोडण्या निश्चित केल्या जाणार आहेत. औंढा नागनाथ, जवळा बाजार व शिरडशहापूर, बाळापूर १ व २, हिंगोली ग्रामीण १ व २, हट्टा, सेनगाव, गोरेगाव-१ व २ च्या क्षेत्रात एकूण २९६३ नवीन जोडण्या देण्यात येणार आहेत. ही जवळपास ४७ कोटी रुपयांची कामे होणार आहेत. यामध्ये डीपी बसविण्यापर्यंतची यंत्रणा, उच्च व लघुदाब वाहिनी, खांब व इतर साहित्याचा यात समावेश आहे. तर नांदापूर, वारंगा, जवळापांचाळ, डोंगरकडा, कळमनुरी शहर, नर्सी, कन्हेरगाव नाका, हिंगोली शहर १ व २, कुरुंदा १, गिरगाव, सेनगाव-२ आदींची २१४२ जोडण्यांची निविदा एकत्रित निघणार आहे. यात १0 केव्हीएचे १७९२ व १६ केव्हीएचे ३0 डीपी राहतील. यापूर्वी या निविदा झाल्या नाहीत. मंजूर व फेरनिविदेतील एकूण कामे जवळपास ८७ कोटींची असून यामुळे जिल्ह्यातील नवीन जोडणी घेणाºया शेतकºयांना फायदा होणार असल्याचे चित्र आहे.हाताळणी सोपी : वीजचोरीला आळायाबाबत कार्यकारी अभियंता रामगिरवार म्हणाले, या नव्या प्रयोगामुळे जिल्ह्यात नवीन जोडण्यांना जे डीपी मिळाले. ते थेट उच्चदाब वाहिनीला जोडलेले असतील. त्यामुळे वीजचोरीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. शिवाय या डीपीवरील शेतकºयांना त्या डीपीची अधिक काळजी राहिल. डीपी जळाल्यास ती मोटारसायकवरून दुरुस्तीला आणता येईल, इतकी हाताळणी सुलभ आहे. नवीन कामांप्रमाणेच टप्प्या-टप्प्याने जुन्याही डीपी काढून असाच प्रयोग महावितरण करण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.यामुळे शेतकºयांना योग्य भाराच्या डीपीमुळे ती जळण्याचे प्रमाण कमी होईल. जळाल्यानंतरच्या रांगेतून मुक्तता होईल. मात्र थकबाकीत जाता येणार नाही. अन्यथा वीज तोडणे सोपे राहणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीelectricityवीजFarmerशेतकरी