शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नव्या जोडणीला दोन शेतकऱ्यांत एक डीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:19 IST

महावितरणकडे यापूर्वी कोटेशन भरूनही प्रतीक्षा यादीत असलेल्या ५ हजारांवर कृषीपंपधारकांना आता जोडणी मिळणार आहे. कृषीपंपाच्या एचपीनुसार एका किंवा दोन जोडण्यांना एक डीपी देण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले.

ठळक मुद्दे९ निविदा मंजूर सहा कामांची एकत्रित फेरनिविदा निघणार, पाच हजार नवीन जोडण्या देताना नवा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणकडे यापूर्वी कोटेशन भरूनही प्रतीक्षा यादीत असलेल्या ५ हजारांवर कृषीपंपधारकांना आता जोडणी मिळणार आहे. कृषीपंपाच्या एचपीनुसार एका किंवा दोन जोडण्यांना एक डीपी देण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांनी कोटेशन भरले म्हणून अवैध जोडण्या केल्या आहेत. त्यामुळे भार वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध डीपींवर अतिरिक्त ताण पडत आहे. जिल्ह्यात कोटेशन भरूनही जोडणी न मिळालेले पाच हजारांवर शेतकरी आहेत. अशा प्रतीक्षा यादीतील पहिल्या पाच हजार शेतकºयांना जोडणी देण्यात येणार आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदांपैकी ९ निविदा मंजूर झाल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. तर आणखी सहा निविदा एकत्रित करून वरिष्ठ स्तरावरून त्याची फेरनिविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात या नवीन जोडण्यांना डीपीही कमी क्षमतेचे राहणार असून ते एका किंवा दोन जोडण्यांसाठी स्वतंत्र राहतील. या डीपीवर अतिरिक्त जोडणीच करणे शक्य राहणार नाही. शिवाय ती झाल्यास संबंधित शेतकºयालाच त्याचा त्रास होणार असल्याने तो करू देणार नाही.या योजनेमुळे वीजचोरीला आळा बसणार असून जवळपास ५१0५ नवीन जोडण्यांना असे डीपी मंजूर झाले. त्यात १0 केव्हीएच्या डीपींची संख्या ४२९७ एवढी राहणार आहे. तर १६ केव्हीएचे ५७ असतील. कृषीपंपाच्या एचपीनुसार त्यावरील जोडण्या निश्चित केल्या जाणार आहेत. औंढा नागनाथ, जवळा बाजार व शिरडशहापूर, बाळापूर १ व २, हिंगोली ग्रामीण १ व २, हट्टा, सेनगाव, गोरेगाव-१ व २ च्या क्षेत्रात एकूण २९६३ नवीन जोडण्या देण्यात येणार आहेत. ही जवळपास ४७ कोटी रुपयांची कामे होणार आहेत. यामध्ये डीपी बसविण्यापर्यंतची यंत्रणा, उच्च व लघुदाब वाहिनी, खांब व इतर साहित्याचा यात समावेश आहे. तर नांदापूर, वारंगा, जवळापांचाळ, डोंगरकडा, कळमनुरी शहर, नर्सी, कन्हेरगाव नाका, हिंगोली शहर १ व २, कुरुंदा १, गिरगाव, सेनगाव-२ आदींची २१४२ जोडण्यांची निविदा एकत्रित निघणार आहे. यात १0 केव्हीएचे १७९२ व १६ केव्हीएचे ३0 डीपी राहतील. यापूर्वी या निविदा झाल्या नाहीत. मंजूर व फेरनिविदेतील एकूण कामे जवळपास ८७ कोटींची असून यामुळे जिल्ह्यातील नवीन जोडणी घेणाºया शेतकºयांना फायदा होणार असल्याचे चित्र आहे.हाताळणी सोपी : वीजचोरीला आळायाबाबत कार्यकारी अभियंता रामगिरवार म्हणाले, या नव्या प्रयोगामुळे जिल्ह्यात नवीन जोडण्यांना जे डीपी मिळाले. ते थेट उच्चदाब वाहिनीला जोडलेले असतील. त्यामुळे वीजचोरीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. शिवाय या डीपीवरील शेतकºयांना त्या डीपीची अधिक काळजी राहिल. डीपी जळाल्यास ती मोटारसायकवरून दुरुस्तीला आणता येईल, इतकी हाताळणी सुलभ आहे. नवीन कामांप्रमाणेच टप्प्या-टप्प्याने जुन्याही डीपी काढून असाच प्रयोग महावितरण करण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.यामुळे शेतकºयांना योग्य भाराच्या डीपीमुळे ती जळण्याचे प्रमाण कमी होईल. जळाल्यानंतरच्या रांगेतून मुक्तता होईल. मात्र थकबाकीत जाता येणार नाही. अन्यथा वीज तोडणे सोपे राहणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीelectricityवीजFarmerशेतकरी