शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

हळदीला भाववाढीची चमक; हिंगोली मार्केट यार्डात ३२०० क्विंटलची आवक

By रमेश वाबळे | Updated: January 29, 2024 19:02 IST

सोयाबीनची घसरगुंडी सुरूच; तुरीला समाधानकारक भाव मात्र उत्पादन निम्म्याखाली

हिंगोली : येथील मार्केट यार्डात सरासरी दहा हजारांवर पोहोचलेल्या हळदीला २९ जानेवारी रोजी भाववाढीची चमक मिळाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास एक ते दीड हजाराने भाववाढ झाली. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सोयाबीनच्या दरात मात्र सुरू असलेल्या घसरगुंडीमुळे शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे, तर तुरीलाही यंदा समाधानकारक भाव आहे. मात्र, उत्पादन नसल्याने भाववाढीचा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हिंगोली बाजार समितीच्या मार्केट यार्डात ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान हळदीने १५ हजारांचा पल्ला गाठला होता. मागील काही वर्षांतून उच्चांकी भाव मिळाल्याने मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात हळद विक्री केली. परंतु, आणखी भाववाढ होईल अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली. परंतु, भाव वाढण्याऐवजी घसरण सुरू झाली. ऑक्टोबरच्या शेवटी घसरलेले भाव नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कायम होते. पडत्या भावामुळे मार्केट यार्डातील आवक मंदावली होती. जवळपास एक हजाराच्या खाली आवक होत असताना २४ जानेवारी रोजी एक ते दीड हजाराने दर वधारले, तर २९ जानेवारी रोजीही कमाल ११ हजार ते किमान १३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलने हळदीची विक्री झाली. भावात वाढ झाल्याने आवकही वाढली असून, या दिवशी ३ हजार २०० क्विंटलची आवक झाली होती.

तर, यंदा सोयाबीनची परिस्थिती वाईट असून, शेतकऱ्यांना पडत्या भावात विक्री करावी लागत आहे. तुरीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

सोयाबीनची घसरगुंडी; उत्पादक रडकुंडी...मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला समाधानकारक दर मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी पडत्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले होते. परंतु, वर्षभरही भाव वाढला नाही. यंदाचे नवीन सोयाबीन आल्यावर तरी भाव वाढतील, अशी आशा होती. मात्र, भाव वाढण्याऐवजी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांना जुने आणि नवे सोयाबीन पडत्या दरात विक्री करावे लागले. यातून अनेक शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन विक्रीविना ठेवले, परंतु भाव वाढण्याऐवजी घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

तुरीला भाव; पण शेतकऱ्यांना लाभ नाही...यंदा तुरीला दहा हजारांवर भाव मिळत आहे. परंतु, पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव आणि अवकाळीच्या फटक्यामुळे उत्पादन निम्म्याखाली आले. काही शेतकऱ्यांना तर यंदा तुरीची काढणीही परवडली नाही. त्यामुळे बाजारात भाव जरी समाधानकारक मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर नाही. त्यामुळे या भाववाढीचा लाभ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र