शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांना आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:25 IST

आदिवासी मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात अचानक अन्नातून विषबाधा, साप चावणे किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास हक्काची कोणतीच आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती. यात अनेकदा आश्रमशाळा प्रशासनातील लोकांच्या खिशाला चाट बसायची. आता शासनाने कळमनुरी प्रकल्पाला रुग्णवाहिकेसह स्टाफही मंजूर केल्याने ही समस्या सुटणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदिवासी मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात अचानक अन्नातून विषबाधा, साप चावणे किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास हक्काची कोणतीच आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती. यात अनेकदा आश्रमशाळा प्रशासनातील लोकांच्या खिशाला चाट बसायची. आता शासनाने कळमनुरी प्रकल्पाला रुग्णवाहिकेसह स्टाफही मंजूर केल्याने ही समस्या सुटणार आहे.हिंगोली हा आदिवासीबहुल जिल्हा अहे. या भागात बोथी, पिंपळदरी, गोटेवाडी, जामगव्हाण, शिरड पाच शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये ढोलक्याचीवाडी, नागेशवाडी, शिरड, शिरळी, लोहगाव व जांभरुण येथील आश्रमशाळेचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये जवळपास साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था व भोजन व्यवस्थाही तेथेच आहे. अनेकदा एवढ्या मोठ्या संख्येतील मुलांची भोजन व्यवस्था करताना कधीतरी अन्नातून बाधाही होते. अशावेळी या मुलांना तत्काळ उपचार मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्य ढासळते. त्याचा अभ्यासावरही परिणाम होतो. त्यामुळे कळमनुरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने रुग्णवाहिका व डॉक्टरची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. आता यानुसार प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प कार्यालयाला रुग्णवाहिकेसह एक डॉक्टर, परिचारिका, कम्पाउंडर व वाहनचालक मिळणार आहे. यासाठी बीव्हीजी कंपनीशी करार केला आहे. ही रुग्णवाहिका प्रकल्प कार्यालयात राहणार आहे. ती गरजेनुसार तत्काळ उपलब्ध होईल. यात प्राथमिक उपचाराच्या सर्व सोयी राहणार आहेत.कळमनुरी प्रकल्पांतर्गतच परभणी जिल्हाही येतो. मात्र तेथे पालम व जिंतूर येथील आश्रमशाळा तालुक्याच्या ठिकाणी आहेत. दोन्हीही ठिकाणी स्थानिकला शासकीय आरोग्य संस्था आहेत. त्यामुळे त्या भागासाठी अशा रुग्णवाहिकेची गरज पडणार नाही. मात्र अतिनिकडीच्या वेळी तेथेही पाठविता येणे शक्य आहे.याबाबत विचारले असता प्रकल्प संचालक डॉ.विशाल राठोड म्हणाले, रुग्णवाहिका व मनुष्यबळ पुरविण्याचा करार कंपनीशी झाला आहे. पुढील महिन्यात ही सेवा प्रत्यक्ष सुरू होणार आहे. प्रकल्प कार्यालयात ही रुग्णवाहिका असेल आॅन कॉल तत्काळ सेवा दिली जाणार आहे. याशिवायवर्षभर नियमितपणे या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. आश्रमशाळांच्या संख्येच्या तुलनेत हे मनुष्यबळ पुरेसे ठरणार आहे. तर गरजेच्या वेळी तात्काळ सेवा देणे यामुळे अधिक सुकर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली असून राज्यभर सर्वत्रच हा प्रयोग राबविला जाणार आहे. शासनाच्या तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :SchoolशाळाHealthआरोग्य