शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; सेनगावात धरणाशेजारील गावेच दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 19:10 IST

सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही.

सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही. पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून धरण जवळ असूनही सिंचनासाठी त्याचा उपयोग होत नसल्याने परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

सिध्देश्वर धरणाजवळील पुसेगाव, खुडज, गोंडाळा, खिल्लार, आडोळ, जामदया, जांभरुण आंध, जांभरुन तांडा, आहेरवाडी, वरुड, समद, वरुड काजी, रिधोरा, जांभरुण रोडगे, पार्डी, पहेणी, रेपा, लिंग पिंपरी आदी गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाचा काहीच फायदा होत नाही. धरणाच्या मोठ्या कालव्याद्वारे वसमत आणि नांदेडच्या शेतकऱ्यांनाच सिंचनासाठी फायदा होत असल्याने ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच काहीशी स्थिती परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.

पावसाने गत दोन महिन्यांपासून दडी दिल्याने खरीप हंगाम पाण्याअभावी पूर्णपणे वाया गेला. धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळाले असते तर खरीप हंगाम वाचवता आला असता ही आशा व्यक्त केल्याशिवाय  येथील शेतकऱ्यांना कोणताच पर्याय उपलब्ध नाही. परिसरात कोरडवाहू व माळरान शेतीचे क्षेत्रफळ मोठे आहे. ओलिताखाली कमीच क्षेत्र आहे.

सिध्देश्वर धरण झाल्यानंतर शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा लाभ होईल अशी आशा होती, मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही आशाही फोल ठरली. सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रकल्पाजवळील गावांना या धरणाचा फायदा होण्याऐवजी नांदेड, वसमत, हट्टा, जवळा बाजार परिसरातील गावांनाच फायदा होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. उन्हाच्या तीव्रतेने खरीप पिके पूर्णत: करपली आहेत. रबीची आशाही धूसर झाली. जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

धरण जवळ असूनही सिंचनासाठी काहीच फायदा येथील शेतकऱ्यांना होत नाही. धरणाचा फायदा नांदेड, वसमत, जवळा बाजार, हट्टा परिसरातील शेतकऱ्यांनाच होत आहे. पाण्यावाचून खरीप हंगामातील पिकांची स्थिती डोळ्यांनी आता बघावली जात नाही. असे पुसेगाव येथील शेतकरी बळीराम धाबे यांनी सांगीतले. तर शेतकरी सुभाष मुंदडा म्हणाले, सिद्धेश्वर धरण जवळ असूनही परिसरातील शेतकरी नापिकीमुळे हतबल झाले आहेत. परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करुन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंदडा यांनी केली. 

टॅग्स :droughtदुष्काळHingoliहिंगोलीDamधरणWaterपाणी