शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; सेनगावात धरणाशेजारील गावेच दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 19:10 IST

सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही.

सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही. पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून धरण जवळ असूनही सिंचनासाठी त्याचा उपयोग होत नसल्याने परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

सिध्देश्वर धरणाजवळील पुसेगाव, खुडज, गोंडाळा, खिल्लार, आडोळ, जामदया, जांभरुण आंध, जांभरुन तांडा, आहेरवाडी, वरुड, समद, वरुड काजी, रिधोरा, जांभरुण रोडगे, पार्डी, पहेणी, रेपा, लिंग पिंपरी आदी गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाचा काहीच फायदा होत नाही. धरणाच्या मोठ्या कालव्याद्वारे वसमत आणि नांदेडच्या शेतकऱ्यांनाच सिंचनासाठी फायदा होत असल्याने ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच काहीशी स्थिती परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.

पावसाने गत दोन महिन्यांपासून दडी दिल्याने खरीप हंगाम पाण्याअभावी पूर्णपणे वाया गेला. धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळाले असते तर खरीप हंगाम वाचवता आला असता ही आशा व्यक्त केल्याशिवाय  येथील शेतकऱ्यांना कोणताच पर्याय उपलब्ध नाही. परिसरात कोरडवाहू व माळरान शेतीचे क्षेत्रफळ मोठे आहे. ओलिताखाली कमीच क्षेत्र आहे.

सिध्देश्वर धरण झाल्यानंतर शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा लाभ होईल अशी आशा होती, मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही आशाही फोल ठरली. सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रकल्पाजवळील गावांना या धरणाचा फायदा होण्याऐवजी नांदेड, वसमत, हट्टा, जवळा बाजार परिसरातील गावांनाच फायदा होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. उन्हाच्या तीव्रतेने खरीप पिके पूर्णत: करपली आहेत. रबीची आशाही धूसर झाली. जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

धरण जवळ असूनही सिंचनासाठी काहीच फायदा येथील शेतकऱ्यांना होत नाही. धरणाचा फायदा नांदेड, वसमत, जवळा बाजार, हट्टा परिसरातील शेतकऱ्यांनाच होत आहे. पाण्यावाचून खरीप हंगामातील पिकांची स्थिती डोळ्यांनी आता बघावली जात नाही. असे पुसेगाव येथील शेतकरी बळीराम धाबे यांनी सांगीतले. तर शेतकरी सुभाष मुंदडा म्हणाले, सिद्धेश्वर धरण जवळ असूनही परिसरातील शेतकरी नापिकीमुळे हतबल झाले आहेत. परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करुन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंदडा यांनी केली. 

टॅग्स :droughtदुष्काळHingoliहिंगोलीDamधरणWaterपाणी