शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; सेनगावात धरणाशेजारील गावेच दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 19:10 IST

सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही.

सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही. पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून धरण जवळ असूनही सिंचनासाठी त्याचा उपयोग होत नसल्याने परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

सिध्देश्वर धरणाजवळील पुसेगाव, खुडज, गोंडाळा, खिल्लार, आडोळ, जामदया, जांभरुण आंध, जांभरुन तांडा, आहेरवाडी, वरुड, समद, वरुड काजी, रिधोरा, जांभरुण रोडगे, पार्डी, पहेणी, रेपा, लिंग पिंपरी आदी गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाचा काहीच फायदा होत नाही. धरणाच्या मोठ्या कालव्याद्वारे वसमत आणि नांदेडच्या शेतकऱ्यांनाच सिंचनासाठी फायदा होत असल्याने ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच काहीशी स्थिती परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.

पावसाने गत दोन महिन्यांपासून दडी दिल्याने खरीप हंगाम पाण्याअभावी पूर्णपणे वाया गेला. धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळाले असते तर खरीप हंगाम वाचवता आला असता ही आशा व्यक्त केल्याशिवाय  येथील शेतकऱ्यांना कोणताच पर्याय उपलब्ध नाही. परिसरात कोरडवाहू व माळरान शेतीचे क्षेत्रफळ मोठे आहे. ओलिताखाली कमीच क्षेत्र आहे.

सिध्देश्वर धरण झाल्यानंतर शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा लाभ होईल अशी आशा होती, मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही आशाही फोल ठरली. सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रकल्पाजवळील गावांना या धरणाचा फायदा होण्याऐवजी नांदेड, वसमत, हट्टा, जवळा बाजार परिसरातील गावांनाच फायदा होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. उन्हाच्या तीव्रतेने खरीप पिके पूर्णत: करपली आहेत. रबीची आशाही धूसर झाली. जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

धरण जवळ असूनही सिंचनासाठी काहीच फायदा येथील शेतकऱ्यांना होत नाही. धरणाचा फायदा नांदेड, वसमत, जवळा बाजार, हट्टा परिसरातील शेतकऱ्यांनाच होत आहे. पाण्यावाचून खरीप हंगामातील पिकांची स्थिती डोळ्यांनी आता बघावली जात नाही. असे पुसेगाव येथील शेतकरी बळीराम धाबे यांनी सांगीतले. तर शेतकरी सुभाष मुंदडा म्हणाले, सिद्धेश्वर धरण जवळ असूनही परिसरातील शेतकरी नापिकीमुळे हतबल झाले आहेत. परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करुन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंदडा यांनी केली. 

टॅग्स :droughtदुष्काळHingoliहिंगोलीDamधरणWaterपाणी