शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

...तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; अडीचशे फुटांपर्यंत जाऊनही पाणी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली : शहरात पाण्याची पातळी चांगली असली तरी नागरिकांना २०० ते २५० फुटांपर्यंत बोअर घ्यावा लागत आहे. पाण्याचा अपव्यय ...

हिंगोली : शहरात पाण्याची पातळी चांगली असली तरी नागरिकांना २०० ते २५० फुटांपर्यंत बोअर घ्यावा लागत आहे. पाण्याचा अपव्यय टाळला नाही, तर भविष्यात पेट्रोलपेक्षाही पाणी महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली शहराची लोकसंख्या ८५ हजार १०३ एवढी आहे. आजमितीस त्यात वाढ होऊन ती १ लाख २५ हजार एवढी झाली आहे. शहराच्या आसपास नवीन वस्तीतही मोठ्या प्रमाणात भर पडल्याचे पाहावयास मिळत आहे. सद्य:स्थितीत शहरात एकूण बोअरवेल १२ हजार जवळपास आहेत. आजमितीस प्रतिव्यक्ती १३५ एलपीडी पाणी लागते. तिरुपतीनगर, नाईकनगर, जिजामातानगर, गंगानगर या भागाचा नवीन वस्तीत समावेश केला जातो.

नगर परिषदेच्या वतीने नळधारकांना वेळोवेळी पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा, अशा सूचना दिल्या जातात; परंतु काही नळधारक नगर परिषदेच्या सूचनांकडे लक्ष न देता पाणी जपून वापरत नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो आहे. पर्ययाने पाण्यासाठी ओरड निर्माण होते. आजमितीस नगर परिषदेच्या वतीने दोन दिवसांआड पाणी दिले जाते. पाणी जपून वापरावे, असे आवाहनही नगर परिषदेने वारंवार केले आहे.

सर्वच ठिकाणी दोन दिवसांआड पाणी...

पाण्याच्या बाबतीत कोणताही दुजाभाव केला जात नाही. मागील कित्येक महिन्यांपासून शहरातील नळधारकांना दोन दिवसांआड पाणी दिले जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून नळधारकांनी नळाला तोट्या बसविणे गरजेचे आहे. यात काहींनी नळांना तोट्या लावल्या आहेत, तर काहींनी नळांना तोट्या सांगूनही लावल्या नाहीत.

नळासाठी केला जातो खड्डा

शहरातील जुन्या व नवीन वस्त्यांमध्ये नळासाठी खड्डा केला जातो. त्या नळाला तोटीसुद्धा नसते. अशावेळी सकाळी सोडलेले पाणी वाया जाते. बहुतांश वेळा खड्डा पाण्याने भरल्यानंतरच नळधारकांच्या लक्षात येते. नळांना तोट्या बसवाव्यात, अशी सूचना नगर परिषदेने वारंवार केली आहे; परंतु नळधारकांच्या कसे लक्षात येत नाही? हा यक्ष प्रश्न आहे.

नवीन वस्तीत जास्त बोअरवेल

शहराचा जुना भाग सोडला, तर शहराच्या आसपास असलेल्या नवीन वस्तीत जास्त प्रमाणात बोअर घेतले आहेत. आजमितीस २०० ते २५० फुटांवर पाणी लागते. काही जण ३०० फुटांच्या जवळपास बोअरवेलची खोली घेतात. भविष्यात पाण्याचा अपव्यय टाळला नाही, तर पेट्रोलपेक्षाही पाणी महाग होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

२ दिवसांआड शहराला पाणीपुरवठा

शहरातील एकूण बोअरवेल ६७५

शहराची एकूण लोकसंख्य १ लाख २५ हजार

प्रति व्यक्ती मिळते पाणी १३५ (एलपीडी)

जलपुनर्भरण नावालाच...

शासनाने जलपुनर्भरणाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरिकांना अजूनही जलपुनर्भरणाबाबत माहिती नाही. रोजच्या रोजच शहरात पाण्याचा अपव्यय होत आहे. यासाठी काहीतरी उपायोजना व्हायला पाहिजेत.

-मुरलीधर कल्याणकर, नागरिक

शहरातील जुनी वस्ती व नवीन वस्ती भागात मागील काही महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. नगर परिषदेचे याकडे अजिबात लक्ष नाही. पुनर्भरण कार्यक्रम हा नावालाच आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

-ॲड. शिवराज सरनाईक, नागरिक