शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

...तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; अडीचशे फुटांपर्यंत जाऊनही पाणी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली : शहरात पाण्याची पातळी चांगली असली तरी नागरिकांना २०० ते २५० फुटांपर्यंत बोअर घ्यावा लागत आहे. पाण्याचा अपव्यय ...

हिंगोली : शहरात पाण्याची पातळी चांगली असली तरी नागरिकांना २०० ते २५० फुटांपर्यंत बोअर घ्यावा लागत आहे. पाण्याचा अपव्यय टाळला नाही, तर भविष्यात पेट्रोलपेक्षाही पाणी महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली शहराची लोकसंख्या ८५ हजार १०३ एवढी आहे. आजमितीस त्यात वाढ होऊन ती १ लाख २५ हजार एवढी झाली आहे. शहराच्या आसपास नवीन वस्तीतही मोठ्या प्रमाणात भर पडल्याचे पाहावयास मिळत आहे. सद्य:स्थितीत शहरात एकूण बोअरवेल १२ हजार जवळपास आहेत. आजमितीस प्रतिव्यक्ती १३५ एलपीडी पाणी लागते. तिरुपतीनगर, नाईकनगर, जिजामातानगर, गंगानगर या भागाचा नवीन वस्तीत समावेश केला जातो.

नगर परिषदेच्या वतीने नळधारकांना वेळोवेळी पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा, अशा सूचना दिल्या जातात; परंतु काही नळधारक नगर परिषदेच्या सूचनांकडे लक्ष न देता पाणी जपून वापरत नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो आहे. पर्ययाने पाण्यासाठी ओरड निर्माण होते. आजमितीस नगर परिषदेच्या वतीने दोन दिवसांआड पाणी दिले जाते. पाणी जपून वापरावे, असे आवाहनही नगर परिषदेने वारंवार केले आहे.

सर्वच ठिकाणी दोन दिवसांआड पाणी...

पाण्याच्या बाबतीत कोणताही दुजाभाव केला जात नाही. मागील कित्येक महिन्यांपासून शहरातील नळधारकांना दोन दिवसांआड पाणी दिले जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून नळधारकांनी नळाला तोट्या बसविणे गरजेचे आहे. यात काहींनी नळांना तोट्या लावल्या आहेत, तर काहींनी नळांना तोट्या सांगूनही लावल्या नाहीत.

नळासाठी केला जातो खड्डा

शहरातील जुन्या व नवीन वस्त्यांमध्ये नळासाठी खड्डा केला जातो. त्या नळाला तोटीसुद्धा नसते. अशावेळी सकाळी सोडलेले पाणी वाया जाते. बहुतांश वेळा खड्डा पाण्याने भरल्यानंतरच नळधारकांच्या लक्षात येते. नळांना तोट्या बसवाव्यात, अशी सूचना नगर परिषदेने वारंवार केली आहे; परंतु नळधारकांच्या कसे लक्षात येत नाही? हा यक्ष प्रश्न आहे.

नवीन वस्तीत जास्त बोअरवेल

शहराचा जुना भाग सोडला, तर शहराच्या आसपास असलेल्या नवीन वस्तीत जास्त प्रमाणात बोअर घेतले आहेत. आजमितीस २०० ते २५० फुटांवर पाणी लागते. काही जण ३०० फुटांच्या जवळपास बोअरवेलची खोली घेतात. भविष्यात पाण्याचा अपव्यय टाळला नाही, तर पेट्रोलपेक्षाही पाणी महाग होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

२ दिवसांआड शहराला पाणीपुरवठा

शहरातील एकूण बोअरवेल ६७५

शहराची एकूण लोकसंख्य १ लाख २५ हजार

प्रति व्यक्ती मिळते पाणी १३५ (एलपीडी)

जलपुनर्भरण नावालाच...

शासनाने जलपुनर्भरणाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरिकांना अजूनही जलपुनर्भरणाबाबत माहिती नाही. रोजच्या रोजच शहरात पाण्याचा अपव्यय होत आहे. यासाठी काहीतरी उपायोजना व्हायला पाहिजेत.

-मुरलीधर कल्याणकर, नागरिक

शहरातील जुनी वस्ती व नवीन वस्ती भागात मागील काही महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. नगर परिषदेचे याकडे अजिबात लक्ष नाही. पुनर्भरण कार्यक्रम हा नावालाच आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

-ॲड. शिवराज सरनाईक, नागरिक