शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीवरून 'तंटा'; माजी अध्यक्षाचा लोखंडी रॉडच्या मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 18:50 IST

नवीन तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्याच्या कारणावरून चावडीवर केली माजी अध्यक्षाला लोखंडी रॉडने मारहाण

- रमेश कदम आखाडा बाळापुर ( हिंगोली): तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून माळधावंडा येथे मोठा 'तंटा' उभा राहून माजी अध्यक्षाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

याप्रकरणी पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. गावातील माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आनंदराव मस्के हे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ६ : ३० वाजण्याच्या सुमारास गावातील तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोरील चावडीवर मुलगा अभिषेकसह बसले होते. त्यावेळी संगनमत करून काहीजण तिथे आले. त्यांनी बाळासाहेब मस्के यांच्यासोबत तंटामुक्ती अध्यक् निवडीवरून आणि मागील भांडणावरून वाद घातला. तसेच अचानक लोखंडी रॉड, लाकडी काठीने मारहाण केली. यात बाळासाहेब मस्के,  अभिषेक मस्के गंभीर जखमी झाले. प्रकृती गंभीर असल्याने बाळासाहेब मस्के यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात अधिकच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. 

या प्रकरणी अभिषेक बाळासाहेब मस्के यांच्या फिर्यादीवरून शंकरराव भगवानराव मस्के , विकास शंकरराव मस्के, अविनाश शंकरराव मस्के, उर्मिलाबाई शंकरराव मस्के , विद्या विकास मस्के , रूपाली अविनाश मस्के , दिलीपराव भगवानराव मस्के, भुजंगराव दिलीपराव मस्के (सर्व राहणार माळधांडा तालुका कळमनुरी)  यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 , 103 (1 ) , 189 ( 2 ) , 191( 2 ) , 191 ( 3 ) , 190 , 352 , 351 ( 2  ) ( 3 ) ,  54 , 118 ( 1 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे करीत आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष होण्याच्या कारणावरून माजी तंटामुक्ती अध्यक्षांचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  गावागावातील वाद गावातच मिटवण्यासाठी व गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गृह विभागाने निर्माण केलेल्या तंटामुक्त ग्राम समित्यावादाचे कारण ठरल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी