शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय, प्रदेशाध्यक्षांच्या पुढ्यात हिंगोली काँग्रेसचा वाद

By विजय पाटील | Updated: October 11, 2023 11:42 IST

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद दोनच दिवसांपूर्वी येथील एका बैठकीत उफाळला होता.

हिंगोली : जिल्ह्यातील काँग्रेसचा वाद काही संपता संपत नसून गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगर येथे १० ऑक्टोबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतही आला. चक्क प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढ्यातच हा वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद दोनच दिवसांपूर्वी येथील एका बैठकीत उफाळला होता. छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत तर त्याला तडका बसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मराठवाड्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतही काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बैठकांना बोलावतच नसल्याची तक्रार पुन्हा समोर आली. तर आढावा घेतानाही अनेक उपक्रम पूर्ण झाले नसल्याने प्रदेशाध्यक्षांनी गटातटावरून कान टोचले. तर ज्यांनी यापूर्वी बैठकांमध्ये वादंग केले, प्रभारींना मारहाण केली, ज्यांना पक्षातून काढून टाकले ते बैठकीला कसे, असा सवाल दुसऱ्या गटाने केला. यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच पेचात पडले. दोनदा वाद झाला, तिसऱ्यांदा झाल्यास खपवून घेणार नाही, थेट कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तर जिल्ह्याचे काम दोन महिन्यांत सुधारण्याची संधी आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चला, असे जिल्हाध्यक्षांना सूचित केले. तर जे सोबत येत नाहीत, त्यांचा अहवाल देण्यासही सांगितले.

लोकसभेवरूनही वादहा वाद मिटत नाही तोच हिंगोली लोकसभेसाठी जिल्ह्यातीलच उमेदवार देण्याची मागणी केल्यावरून पुन्हा वातावरण गंभीर झाले. एका नेत्यांनी इतर जिल्ह्यातील मतदान तुम्हाला पाहिजे नाही का? जर तुमच्यात एकजूट नसेल, जिल्हावाद कराल तर ठाकरे गट ही जागा मागत आहे. आता राष्ट्रवादीही आग्रही होत चालल्याचे सांगून धोका लक्षात घेण्यास सांगितले. तरीही हिंगोलीबाहेरचाच उमेदवार आमच्यावर कायम थोपवला जात असून त्याचा फटका बसत असल्याचे मत या कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आले. विशेष म्हणजे इच्छुकांपैकी बहुतेक जिल्ह्याबाहेरील आहेत.

थोरातांच्या पक्षप्रवेशाला पुन्हा ब्रेकप्रकाश थोरात यांनी या सभागृहात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रवेशावरून पुन्हा एकदा गदारोळ झाला. या गोरेगावकर गटातील काहींनी आम्ही पक्ष सोडणार असल्याचे म्हटले. त्यामुळे थोरात यांच्या पक्ष प्रवेशाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. तर यावेळी घोषणांचा मोठा गोंधळही झाला. सातव व गोरेगावकर गटातील वाद संपुष्टात आला नसताना हा नवा गोंधळ उभा राहिला आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAurangabadऔरंगाबादHingoliहिंगोलीcongressकाँग्रेस