सोयाबीन पोहोचले ७ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:03+5:302021-05-07T04:31:03+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. काही व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. आता कृषी क्षेत्राशी निगडित व्यवहार सुरू ...

Soybeans reached 7,000 | सोयाबीन पोहोचले ७ हजारांवर

सोयाबीन पोहोचले ७ हजारांवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. काही व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. आता कृषी क्षेत्राशी निगडित व्यवहार सुरू झाले असून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी शहरात आणत आहेत. हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोढ्यात तूर, हरभरा, बाजरी, हळद, ज्वारी आदी शेतमाल विक्रीसाठी येत आहे. मात्र, आवक वाढल्याने या शेतमालाचे दर घसरण्यास सुरुवात झाली. सध्या गहू २४०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल, टाळकी १७०० ते २००० रुपये, हरभरा ४८०० ते ५२०० रुपये, हायब्रीड ९०० ते ११०० रुपये, तूर ६३५० ते ६७२५ रुपये तर हळदीला ६५०० ते ७४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतमालाची आवक होत असलेली दिसताच शेतमालाचे भावही घसरत आहेत. एकीकडे तूर, हळद, गहू, ज्वारी आदी शेतमालाचे दर घसरत असताना सोयाबीनच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी चांगल्या सोयाबीनला उच्चांकी ७ हजार रुपये भाव मिळत होता. खाद्य तेलाच्या किमती वाढत असल्याने सोयाबीनला मागणी वाढली असल्याचे व्यापारी साांगत आहेत. तसेच टाळेबंदीमुळे व्यवहारावर मर्यादा आली आहे. त्यामुळे पैसा खेळता राहत नसल्याने शेतमालाचे दर घसरत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सोयाबीनचे दर वाढत असले तरी मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक राहिले आहे. काही शेतकरी तर पेरणीसाठी ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत.

Web Title: Soybeans reached 7,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.