शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

धक्कादायक ! पाण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 6:44 PM

सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता.

ठळक मुद्देया घटनेनंतर हे प्रकरण आपसात तडजोडीने मिटविण्याचाही प्रयत्न झाला.

वसमत : तालुक्यातील सातेफळ येथे सामायिक विहिरीवरून भिजवणीसाठी पाणी घेण्याच्या वादातून २२ नोव्हेंबर रोजी खून झाला. याप्रकरणी २५ नोव्हेंबरला हट्टा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन आरोपींना अटक झाली असून न्यायालयाने आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर २२ नोव्हेंबर रोजी मोटर लावून भिजवण करत असलेल्या शेतकरी पंजाब व्यंकटराव अंभोरे (वय ३२) यांच्या डोक्यात लाकडाने मारून ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर हे प्रकरण आपसात तडजोडीने मिटविण्याचाही प्रयत्न झाला.

अडीच एकर शेतजमिनीची रजिस्ट्री करून देण्यावर तडजोडीची चर्चाही होती. त्यातून खून प्रकरणाची तक्रार हट्टा ठाण्यात दोन दिवस देण्यात आली नाही. तडजोडीच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर २५ रोजी हट्टा ठाण्यात खून प्रकरणाची तक्रार देण्यात आली. मयताची पत्नी विद्या पंजाब अंभोरेच्या तक्रारीवरून आदिनाथ अंभोरे, श्रीधर अंभोरे या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. त्यांना न्यायालयासमाेर उभे केले असता, २९ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सामायिक विहिरीवर मोटार लावण्याच्या कारणावरून रागाच्या भरात एकाचा खून करण्याचा प्रकार घडला. मात्र तो दडपून टाकण्याचाही प्रकार झाला होता. तडजोड न झाल्याने ही बाब उजेडात आली आहे.

...अन् विहिरीसह जमीन देण्याची तयारीभावकीतील भांडणे व वाद किती विकोपाला जातात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. दोन कुटुंबांतील सामायिक विहिरीला पाणी एवढे आहे की, दोन्ही मोटारी लावल्या तरी उपसा हाेत नाही. असे असले तरी भावकीत वादावाद व एकमेकांचा द्वेष यावरून वाद हाेत असे. या घटनेच्या एक दिवस अगोदरच दोन्ही कुटुंबांत वाद झाला होता. ग्रामस्थांनी प्रकरण मिटविले होते. दुसऱ्या दिवशी मोटार लावल्याने राग अनावर झाल्याने डोक्यात लाकडाने मारून खुनाची घटना घडली. याप्रकरणी तडजाेडीसाठी विहिरीसह दोन एकर दोन गुंठे जमीन मयताच्या नातेवाईकाला रजिस्ट्री करून देण्याची तयारी झाली असल्याचे वृत्त आहे. मात्र रजिस्ट्री करून दिल्यानंतरही प्रकरण मिटेल का नाही, यावरून पुन्हा मतभेद झाल्याने प्रकरण पोलिसांत गेले. ‘शेत गेले तरी हरकत नाही, पण धुरा गेला नाही पाहिजे’ या प्रमाणेच पाण्यासाठी खून झाल्यानंतर विहिरीवर पाणी सोडण्याची वेळ आल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. भाऊबंदकीतील वाद विकोपाला जाऊ नये, याचाच धडा ही घटना देत आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी