शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

‘जलयुक्त’ला वाळूचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:59 IST

जिल्ह्यात वाळूच्या घाटांचा लिलाव होत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधाऱ्यांची कामे रखडून पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात वाळूच्या घाटांचा लिलाव होत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधाऱ्यांची कामे रखडून पडली आहेत. त्यासाठी वारंवार मुदतवाढ मागितली जात आहे. तर आता थेट मंत्रालयातूनच वाळू उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाºयांना पत्र आले आहे.हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतील चालू वर्षातील कामांचा पत्ता नाही. तर मागील वर्षीची कामेही वाळूअभावी रखडून पडली आहेत. त्यामुळे निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतील कामांची ही परिस्थिती असेल तर इतर कामांचा काही विचारच न केलेला बरा. विशेष म्हणजे आता शासकीय कामे ठप्प अन् खाजगी कामे जोरात आल्याचे चित्र आहे. शासकीय कामांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन-प्रशासनाने मार्ग काढणे गरजेचे आहे.हिंगोली उपविभागात जलसंधारण विभागातर्फे २0१७-१८ च्या मंजूर आराखड्यातील नाला खोलीकरणाची १७८ पैकी १७५ कामे पूर्ण झाली आहेत. ३ कामे अपूर्ण आहेत. तर सिमेंट नाला बांधाची ४१ पैकी केवळ १0 कामेच पूर्ण झाली. २३ कामे सुरू आहेत. ८ कामे तर वाळू घाटांचा लिलाव न झाल्याने सुरूच करता आली नाहीत. ही कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २0१९ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे या विभागाकडून करण्यात आली आहे.तर जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनीही जिल्हाधिकाºयांना पत्र दिले आहे. त्यात सिंचन अनुशेष व जलयुक्त शिवार योजनेतील कामे राज्यपालांच्या निर्देशाप्रमाणे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी वाळू उपलब्ध करून देण्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले आहे. त्याचबरोबर रोहयो विभागानेही जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना पत्र देवून या कामांसाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी कळविले आहे. वाळू नसल्याने ९.८३ कोटी रुपयांची कामे अडकून पडली आहेत. तर जलयुक्तचीही कोट्यवधीची कामे अपूर्ण आहेत. आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते? याकडे लक्ष लागले आहे. दिवसेंदिवस वाळूचा प्रश्न गंभीर होत चालला असून कामे प्रभावित होत आहेत.वाळूघाटाच्या लिलावासंदर्भात जिल्हा खनिकर्म विभागाने मागील महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्याची निविदाही प्रसिद्ध केली होती. मात्र ऐनवेळी पुन्हा हा प्रश्न हरित लवादाकडे गेल्याने त्याला स्थगिती द्यावी लागली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना हा प्रकार घडला.१४ जानेवारीला शासन यावर आपले म्हणने सादर करणार आहे. त्यानंतर लिलावाचा मार्ग मोकळा होणार की हा प्रश्न असाच चिघळणार हे स्पष्ट होणार आहे. तूर्त तरी या प्रश्नावर निर्णय होईपर्यंत पत्रव्यवहाराच चालणार असल्याचे दिसते.जिल्ह्यात काही ठिकाणी दगडापासून मशिनद्वारे बनविलेल्या वाळूचा वापर आता सुरू झाला आहे. त्यामुळे योग्य तांत्रिक सल्ला घेवून असा पर्याय निवडल्यास इतर कामेही करणे शक्य होणार असल्याचे दिसते.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीgovernment schemeसरकारी योजना