शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सत्ताधाऱ्यांनी आश्वासनांची पूर्तता केली नाही; जनतेने त्यांना मतदानातून धडा शिकवावा - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 20:57 IST

केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाही.

वसमत (हिंगोली ) : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाही. जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे आता जनतेने सत्ताधाऱ्यांना मतदानाद्वारे धडा शिकवावा. आगामी निवडणूकीत परिवर्तन घडवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. वसमत येथे आयोजित परिवर्तन निर्धार सभेत ते मार्गदर्शन करत होते.

वसमत येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवतर्नाची निर्धार सभा घेण्यात आली. सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष मुनीर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मार्गदर्शन करताना केंद्रात व राज्यात शेतीची व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची माहिती व जाण नसलेले लोक सत्तेत आहेत. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे मत व्यक्त करून आता त्यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणात भाजप सरकारवर कडाडून टिका केली. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना मला अडीच वर्ष तुरूंगात डांबले. दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाचे बांधकाम दर्जेदार केले. चांगले काम करवून घेतले. शंभर कोटी रुपयांचे हे काम होते. त्या गुत्तेदाराला अद्यापपर्यंत एक रुपयाही सरकारने दिलेला नाही तरीही माझ्यावर ८०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा बिनबुडाचा आरोप केल्याचे छगन भुजबळ यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टिका केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनगर आरक्षणाचा शब्द सरकारने दिला होता. तो अद्याप पूर्ण केलेला नाही. पंतप्रधानांनी १५ लाख रुपये खात्यात वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले नाही. जनतेची दिशाभूल करून हे सरकार सत्तेवर आले असल्याचे सांगून आता परिवर्तनाची गरज असल्याचे सांगून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धोंडीराम पार्डीकर यांनी केले. सभेस मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसHingoliहिंगोली