शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

हिंगोली जिल्ह्यातील २६३१ शिक्षक - कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:56 IST

हिंगोली जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू  होणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना पत्र

हिंगोली : नववी ते बारावी तसेच महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माध्यमिक विभागाकडून जवळपास २८३७ शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र आदेश काढून विविध सूचना दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू  होणार आहेत. त्यासाठी तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरटीपीसीआर चाचण्यांसाठी स्वॅब घेण्यास आदेशित केले. १९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ही चाचणी करून घ्यायची आहे. माध्यमिकच्या २२७० तर उच्च माध्यमिकच्या ३६१ जणांची चाचणी करण्यात येणार आहे.

२१४ माध्यमिक शाळाहिंगोली जिल्ह्यात माध्यमिकच्या शाळांची एकूण संख्या २१४ एवढी आहे. यात अनुदानित शाळा ९२, विनाअनुदानित शाळा २३, अंशत: अनुदानित शळा १५, स्वयंअर्थसहायित शाळा ३२, जिल्हा परिषदेच्या शाळा २९ आहेत. तर जवाहर नवोदय विद्यालय व सैनिकी शाळाही प्रत्येकी १ आहे.  याशिवाय आश्रमशाळाही २१ असून या ठिकाणच्या शिक्षक कर्मचाऱ्यांची चाचणी होईल.

उच्च माध्यमिकच्या अवघ्या ११२ शाळाहिंगोली जिल्ह्यात उच्च माध्यमिकच्या अवघ्या ११२ शाळा आहेत. त्यातही अनुदानित १९, विनाअनुदानित ८४, स्वयंअर्थसहायित ७ तर २ आश्रमशाळा आहेत. अंशत:  अनुदानित, जिल्हा परिषदेची शाळा नाही. तर जवाहर नवोदय व सैनिकी शाळेतही उच्च माध्यमिक नाहीत. यांचे एकूण ३६१ शिक्षक व कर्मचारी हजर राहतील.

अशी आहे विद्यार्थी संख्याहिंगोली जिल्ह्यात माध्यमिकचे नववी ते दहावीचे एकूण विद्यार्थी ३८ हजार ९२६ आहेत. यात मुले २०४१५ तर मुली १८५११ आहेत. यातील शासकीय ६३५, जि.प.चे ४२९४, खाजगी अनुदानित २९५५५, खाजगी विनाअनुदानित १९१३, स्वयंअर्थसहायित २५२९ आहेत. तर ११ वी १२ वीचे २७ हजार ४४ आहेत. यात मुले १४५२७ तर मुली १२५१७ एवढ्या आहेत.

पालकांची संमती आवश्यकहिंगोली जिल्ह्यात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्याचप्रमाणे मुलांनाही शाळेत पाठविण्यापूर्वी पालकाची लेखी संमती घेणे आवश्यक केले आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबत पुन्हा आदेश काढले आहेत. संबंधित यंत्रणांनी यावर अंमल करून घ्यायचा आहे.

कोरोनाविषयक काळजी घेण्याच्या सूचनाहिंगोली जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू करण्यासाठी सर्व संबंधित शाळांना सूचना दिल्या आहेत. सॅनिटायझर व इतर बाबी स्थानिक प्रशासन देणार आहे. त्यामुळे काही शाळांनी मांडलेली ही समस्याही दूर झाली आहे, असे शिक्षणाधिकारी पी.बी.पावसे म्हणाले.

आजारींनी येवू नयेशाळा सुरू झाल्यावर मुलांची चाचणी होणार नाही. त्यामुळे आजारी मुलांनी शाळेत येवू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे याकडे लक्ष ठेवावे लागेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीTeacherशिक्षक