शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक समितीला : वर्षा गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 20:07 IST

स्थानिक परिस्थिती जास्त महत्त्वाची आहे. त्यात कोणताही धोका पत्करता येणार नाही.

ठळक मुद्देशाळा कधी सुरू होतील, याची पालकांना उत्सूकता

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे खूप गरजेचे असल्याने शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीला दिल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शाळा कधी सुरू होतील, याची पालकांना उत्सूकता असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, ‘‘शाळा सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना आधीच दिल्या होत्या. मात्र, त्यासाठी स्थानिक परिस्थिती जास्त महत्त्वाची आहे. त्यात कोणताही धोका पत्करता येणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीवर हा निर्णय सोपविला. शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.’’

खाजगी इंग्रजी शाळांच्या शुल्कवाढीच्या मुद्यावर त्या म्हणाल्या, आम्ही यासंदर्भात शासन आदेश काढला होता. यात शाळांनी शुल्क वाढवू नये व पालकांना सध्या आर्थिक चणचण असल्याने तूर्त सक्ती करू नये. टप्प्याटप्प्याने शुल्क घेण्यास सांगितले होते. मात्र, त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यासह राज्यात शिक्षण विभागात असलेल्या रिक्त पदांबाबत विचारले असता ही वस्तूस्थिती असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, यासाठी शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली होती. या जागा तातडीने भरणे गरजेचे होते. मात्र, कोरोनाचे संकट आल्यानंतर ही प्रक्रिया काहीशी मागे पडली. मात्र, हे सावट दूर झाल्यानंतर हा विषय प्राधान्याने निकाली काढला जाणार आहे. शासन याबाबत गंभीर आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीVarsha Gaikwadवर्षा गायकवाडSchoolशाळाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या