शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हिंगोलीत पुन्हा अतिक्रमण हटाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:35 IST

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले.हिंगोली शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिकेने गतवर्षी मोहीम राबविली होती. यामध्ये शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांवर आलेल्या ओट्यांपासून ते अवैध बांधकामांवर जेसीबी चालविला होता. गांधी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय, पळशी रोड, जवाहर रोड, शहरातून जाणारा अकोला रोड तर मोकळा श्वास घेवू लागला होता. एवढेच नव्हे, तर जुन्या भागातील व नवीन नगरांमधील अतिक्रमणांवरही टाच आणली होती. या मोहिमेला विरोध अन् समर्थन दोन्हीही तेवढ्याच प्रमाणात मिळाले होते. एवढेच नव्हे, तर रामलीला मैदानही महसूल प्रशासनाने मोकळे केले होते. मात्र पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. यातच मागील आठवड्यातील एका मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर या अतिक्रमणांकडे लक्ष वेधल्या गेले.हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा अग्रसेन चौक परिसरात सकाळी दाखल झाला. त्यांनी या मार्गावरील अतिक्रमणांवर जेसीबी चालविला. यात अनेकांच्या टपºया, खोक्यांचे नुकसान झाले. इतर काहींनी तर संधी साधून घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अतिक्रमणांचा रहदारीला त्रास होत असून त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमिवर ही कारवाई केली आहे. शहरात इतर ठिकाणी असलेली अतिक्रमणेही स्वत:हून काढून घ्यावी अन्यथा कुणाचाही मुलाहिजा न करता थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अतिक्रमणधारकांना वारंवार सूचना देवूनही ते दाद देत नसतील तर थेट कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. पालिकेच्या क्षेत्रीय अधिकाºयांनीही आपापल्या भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न न केल्यास कारवाईचा इशाराही दिला.पदपाथ रिकामे होतीलशहरातील काही रस्त्यांवर पदपाथ आहेत. मात्र त्यावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना तेथून चालताही येत नाही. हे पदपाथ रिकामे करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. नगरपालिका यासाठीही मोहीम राबविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिक्रमणांवर जेसीबी चालविल्याने मात्र यात अनेकांच्या टपºया व खोक्यांचे नुकसान झाले. त्यामुळे टपरीधारकही संतप्त झाल्याचे दिसून आले. अतिक्रमणांचा रहदारीला त्रास होत असून त्यामुळे तक्रारी वाढल्याने हिंगोली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.अतिक्रमणाच्या नावाखाली नुकसान केल्याचा आरोप४अतिक्रमण हटाव मोहिमेत फुटकळ व्यापाºयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई करून संबधित अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना व्यापाºयांनी दिले. पालिकेने जेसीबीचा वापर करून फुटकळ व्यापाºयांची दुकाने, टपरी, गाडे, खोके तोडून टाकले. विनंती करूनही वेळ दिला नाही. परिणामी, मोठे नुकसान झाले. त्यामुळे भरपाई द्यावी तसेच अतिक्रमण हटाव करताना अधिकारी क्षेत्रीय अधिकारी, जेसीबीचालक यांनी नाहक अतिरेकी भूमिका घेतली. बसस्थानक परिसरात टपरीत तौफिक शेख हा मुलगा बसलेला असताना जेसीबी चालविली. सुदैवाने उडी मारल्याने तो बचावल्याचे निवेदनात म्हटले आहे. फुटकळ व्यापारी सोमवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन अधिकाºयांवर कारवाईची मागणी करणार आहेत. निवेदनावर राजेंद्र दुबे, विश्वास मादेवाड, शेख अहमद, घनश्याम राखुंडे, फेरोजखान पठाण आदींंच्या स्वाक्षºया आहेत.राकाँच्या फलकावरून वाद४शहरातील वंजारवाडा भागात १२ जानेवारी रोजी नगर परिषदेतील राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून राष्टÑवादी काँग्रेस पार्टीचा फलक पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याचा आरोप राकाँचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर यांनी केला. रविवारी होणाºया कार्यक्रमात फलक न दिसावा यासाठी केलेला हा खटाटोप राष्टÑवादी काँग्रेस पार्टीने हाणून पाडून शाखेची पाटी अखेर त्याच जागी लावल्याचे पत्रक त्यांनी काढले. सदर फलक पालिकेने काढून टाकल्यानंतर राकाँचे आ. रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, बालाजी घुगे आदींनीही मुख्याधिकाºयांना जाब विचारला. त्यानंतर लगेच फलक आहे त्याच जागी लावला. यावेळी तालुकाध्यक्ष माधव कोरडे, शहराध्यक्ष जावेद राज, केशव शांकट, इरफान पठाण आदी हजर होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण