शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हिंगोलीत पुन्हा अतिक्रमण हटाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:35 IST

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले.हिंगोली शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिकेने गतवर्षी मोहीम राबविली होती. यामध्ये शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांवर आलेल्या ओट्यांपासून ते अवैध बांधकामांवर जेसीबी चालविला होता. गांधी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय, पळशी रोड, जवाहर रोड, शहरातून जाणारा अकोला रोड तर मोकळा श्वास घेवू लागला होता. एवढेच नव्हे, तर जुन्या भागातील व नवीन नगरांमधील अतिक्रमणांवरही टाच आणली होती. या मोहिमेला विरोध अन् समर्थन दोन्हीही तेवढ्याच प्रमाणात मिळाले होते. एवढेच नव्हे, तर रामलीला मैदानही महसूल प्रशासनाने मोकळे केले होते. मात्र पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. यातच मागील आठवड्यातील एका मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर या अतिक्रमणांकडे लक्ष वेधल्या गेले.हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा अग्रसेन चौक परिसरात सकाळी दाखल झाला. त्यांनी या मार्गावरील अतिक्रमणांवर जेसीबी चालविला. यात अनेकांच्या टपºया, खोक्यांचे नुकसान झाले. इतर काहींनी तर संधी साधून घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अतिक्रमणांचा रहदारीला त्रास होत असून त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमिवर ही कारवाई केली आहे. शहरात इतर ठिकाणी असलेली अतिक्रमणेही स्वत:हून काढून घ्यावी अन्यथा कुणाचाही मुलाहिजा न करता थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अतिक्रमणधारकांना वारंवार सूचना देवूनही ते दाद देत नसतील तर थेट कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. पालिकेच्या क्षेत्रीय अधिकाºयांनीही आपापल्या भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न न केल्यास कारवाईचा इशाराही दिला.पदपाथ रिकामे होतीलशहरातील काही रस्त्यांवर पदपाथ आहेत. मात्र त्यावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना तेथून चालताही येत नाही. हे पदपाथ रिकामे करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. नगरपालिका यासाठीही मोहीम राबविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिक्रमणांवर जेसीबी चालविल्याने मात्र यात अनेकांच्या टपºया व खोक्यांचे नुकसान झाले. त्यामुळे टपरीधारकही संतप्त झाल्याचे दिसून आले. अतिक्रमणांचा रहदारीला त्रास होत असून त्यामुळे तक्रारी वाढल्याने हिंगोली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.अतिक्रमणाच्या नावाखाली नुकसान केल्याचा आरोप४अतिक्रमण हटाव मोहिमेत फुटकळ व्यापाºयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई करून संबधित अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना व्यापाºयांनी दिले. पालिकेने जेसीबीचा वापर करून फुटकळ व्यापाºयांची दुकाने, टपरी, गाडे, खोके तोडून टाकले. विनंती करूनही वेळ दिला नाही. परिणामी, मोठे नुकसान झाले. त्यामुळे भरपाई द्यावी तसेच अतिक्रमण हटाव करताना अधिकारी क्षेत्रीय अधिकारी, जेसीबीचालक यांनी नाहक अतिरेकी भूमिका घेतली. बसस्थानक परिसरात टपरीत तौफिक शेख हा मुलगा बसलेला असताना जेसीबी चालविली. सुदैवाने उडी मारल्याने तो बचावल्याचे निवेदनात म्हटले आहे. फुटकळ व्यापारी सोमवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन अधिकाºयांवर कारवाईची मागणी करणार आहेत. निवेदनावर राजेंद्र दुबे, विश्वास मादेवाड, शेख अहमद, घनश्याम राखुंडे, फेरोजखान पठाण आदींंच्या स्वाक्षºया आहेत.राकाँच्या फलकावरून वाद४शहरातील वंजारवाडा भागात १२ जानेवारी रोजी नगर परिषदेतील राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून राष्टÑवादी काँग्रेस पार्टीचा फलक पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याचा आरोप राकाँचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर यांनी केला. रविवारी होणाºया कार्यक्रमात फलक न दिसावा यासाठी केलेला हा खटाटोप राष्टÑवादी काँग्रेस पार्टीने हाणून पाडून शाखेची पाटी अखेर त्याच जागी लावल्याचे पत्रक त्यांनी काढले. सदर फलक पालिकेने काढून टाकल्यानंतर राकाँचे आ. रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, बालाजी घुगे आदींनीही मुख्याधिकाºयांना जाब विचारला. त्यानंतर लगेच फलक आहे त्याच जागी लावला. यावेळी तालुकाध्यक्ष माधव कोरडे, शहराध्यक्ष जावेद राज, केशव शांकट, इरफान पठाण आदी हजर होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण