शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
4
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
5
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
6
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
7
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
8
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
9
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
10
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
11
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
12
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
13
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
14
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
15
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
16
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
17
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
18
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
19
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
20
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 22:43 IST

रजनीताई सातव या वकिली व्यवसायातून सामाजिककार्याकडे वळल्या...

- शेख इलियास -कळमनुरी : माजी मंत्री रजनीताई सातव यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने विकासाचा महामेरू हरवला आहे. 

रजनीताई सातव या वकिली व्यवसायातून सामाजिककार्याकडे वळल्या. त्यांचा जन्म पुणे येथे १३ जुलै १९४९ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण सेवासदन पुणे येथे झाले. १९८० मध्ये त्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. रजनीताई सातव यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हिंगोली जिल्हा होण्यापूर्वी कळमनुरी मतदारसंघ हा माकपाचा बालेकिल्ला होता. १९८२ मध्ये मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात त्यांना आरोग्य उपमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून रजनीताई सातव यांनी कळमनुरी मतदारसंघात विकासाची कामे सुरू केली. या काळात १९८३ मध्ये त्यांचे पती डॉ. शंकरराव सातव यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दु:खातून नंतर त्या सावरल्या. फेब्रुवारी १९८३ ते १९८५ या वर्षात वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर महसूल राज्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकण्यात आली. या वर्षात त्या दुसऱ्यांदा कळमनुरी विधानसभेवर निवडून आल्या.१९८५ मध्ये मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकण्यात आली. याचवर्षी त्यांच्यावर कापूस पणन महासंघावर संचालिका म्हणून जबाबदारी टाकण्यात आली होती. मार्च १९८६ मध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. १९८७ मध्ये त्यांना महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी टाकण्यात आली. १९८८ मध्ये त्यांना मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून राज्यमंत्रिपद देण्यात आले.

महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले...राज्यातील परिचारिका सेवा विषय समितीच्या त्या अध्यक्ष बनल्या. त्यानंतर दोनवेळा विधान परिषदेच्या आमदारही राहिल्या. काँग्रेस पक्षाने त्यांना महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची जबाबदारी सोपविली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महिलांना न्याय मिळवून दिला. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती. काँग्रेस पक्षाची पाळेमुळे त्यांनी प्रत्येक खेडोपाड्यापर्यंत रुजविली होती.

पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळविली...कळमनुरी शहरासाठी पहिली पाणीपुरवठा योजना त्यांनी मंजूर करून आणली होती. आदिवासी समाजासाठी विविध योजना त्यांनी मंजूर करून आणल्या होत्या. विकासाची कामे करून त्यांनी कळमनुरी तालुक्याचा चेहरामोहरा बदलला होता. पुढच्या पिढीसाठी त्यांनी अनेक विकासाची कामे करून ठेवली. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात काँग्रेसचा बोलबाला होता. त्यांच्याकडे काम घेऊन आलेल्या प्रत्येकाचे काम झाले पाहिजे, अशी जिद्द त्यांची इच्छा होती. प्रत्येक जण आपले काम घेऊन त्यांच्याकडे जात होते. जात-पात व पक्षाचा विचार न करता त्यानी सर्वांची कामे केली.

गरिबांसाठी शिक्षणाची दारे खुली केली...कळमनुरी तालुका हा मागासलेला व डोंगराळ भागात असल्याने त्यांनी प्रियदर्शिनी सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कळमनुरी शहरात विद्यालय, महाविद्यालय व तालुक्यात काही ठिकाणी शाळा सुरू करून सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली. राज्यमंत्रिपदी असताना त्यांनी कळमनुरी येथील एसटी आगार शासनाकडून मंजूर करून आणले होते. विकासाची कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता. दोन वर्षांपूर्वी त्यांचे चिरंजीव स्व. खा. राजीव सातव यांचे निधन झाल्यामुळे त्या चांगल्याच खचल्या होत्या.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूcongressकाँग्रेस