शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. यावेळी आमदार तान्हाजी मुळकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पेरणीबाबत तांत्रिक तपशील समजेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. तसेच शासनाने तयार केलेल्या सोयाबीन लागवडीच्या चतु:सूत्री कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. खते व बियाणे शेतकऱ्यांना योग्य दरात व योग्य वेळी उपलब्ध होतील यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. तसेच बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण व पीक विम्याचा लवकरात लवकर लाभ उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा जमा झाला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यात लक्ष घालण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यावेळी बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीक परिस्थितीचा सविस्तर अहवाल सादर केला.