शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हिंगोली: जिल्ह्यात १९ मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळ, वारा, विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची ...

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

हिंगोली: जिल्ह्यात १९ मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळ, वारा, विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी जनावरे व जनावरांच्या चाऱ्याची साठवणूक योग्य ठिकाणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

हळद काढणीला सुरुवात

हिंगोली: तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे व परिसरात गत दोन दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा वाढू लागल्याने शेतकरी उन्हाच्या आधी हळद कशी काढता येईल, याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे हळदीचे उत्पन्न गतवर्षीपेक्षा कमी झाल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे पहायला मिळत आहेत.

मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त

कळमनुरी: शहरातील मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वेळोवेळी शहर वाहतूक शाखेला कळविण्यात आले; परंतु अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

‘स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज’

कळमनुरी: येथील बसस्थानकात पाणी पाऊच, पाण्याची बॉटल, गुटख्याच्या पुड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकातील प्रवाशांना कचऱ्याचा त्रास होत आहे. मध्यंतरी काही प्रवाशांनी आगार प्रमुखांना बसस्थानकातील कचऱ्याबाबत सांगितले; परंतु अद्याप तरी दखल घेतली गेली नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.

वाडी- तांड्यांवर पाणीटंचाई

करंजी: वसमत तालुक्यातील करंजी परिसरातील वाडी-तांड्यावर तसेच छोट्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे हातपंपही बंद पडलेले आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता तालुका प्रशासनाने गावोगावी पाण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच

हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बस स्थानक परिसर आदी भागात मागील काही दिवसांपासून विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘जड वाहने बाजारपेठेत दाखल’

हिंगोली: जड वाहनांना शहरात परवानगी नसतानाही दोन-चार दिवसांपासून जड वाहने शहरात दाखल होत आहेत. जड वाहनांसाठी खटकाळी बायपास करून दिलेला असताना काही जड वाहने हे शहराच्या मध्यवस्थीतून बिनधास्त जात आहेत. जड वाहनामुळे बुधवारी दुपारच्या वेळेला काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना शहरातून प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.