खरीप हंगामाला प्रारंभ होण्यासाठी आता २0 दिवसांचा काळ उरला आहे. तरीही बँका पीककर्जाचे शेतकऱ्यांचे अर्जच स्वीकारत नसून अग्रणी बँकही नुसतीच बुजगावण्याची भूमिका निभावत असल्याने शेतकरी कर्जमाफी झाल्याने तरी कर्ज मिळेल, या भ्रमातच आहे. उद्दिष्टाच्या एक टक् ...
तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. ...
लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली ये ...
राष्ट्रीय महामार्गालगत कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथे आखाड्यावरून ढोल केलेले हळदीचे २४ कट्टे चोरीस गेल्याची घटना १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला. ...
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानातील साहित्य पूर्णपणे खाक झाले असून इमारतही क्षतीग्रस्त झाली आहे. ...